मुंबई : संभाजी महाराज हे धर्मवीर कधीच नव्हते, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यावरून भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. जोपर्यंत अजित पवार माफी मागत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
“हिमंत असेल तर शनिवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा”; पडळकरांना आव्हान
जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकार परिषद घेऊन औरंगजेब क्रुर आणि हिंदुद्वेष्टा असता तर त्याने विष्णुचं मंदिरही फोडलं असतं. असं वक्तव्य केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला, त्यांचे नेते म्हणतात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते आणि त्यांचेच दुसरे नेते म्हणतात ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं तो औरंगजेब क्रुर नव्हता. अशी टिका निलेश राणे यांनी केली आहे.
“संजय राऊतांच्या एकाएका वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघतं”; विनायक राऊत
छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्याठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रुर आणि हिंदुद्वेष्टा असता तर त्याने विष्णुचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंंना तुळापुरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की, उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो. असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
“आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू”; रूपाली पाटलांनी घेतला या नेत्याचा समाचार
दरम्यान, अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर भाजपने वेगवेगळ्या शहरात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला,
त्यांचे नेते म्हणतात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते आणि त्यांचेच दुसरे नेते म्हणतात ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं तो औरंगजेब क्रूर नव्हता.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 3, 2023
Read also
- पिंपरी चिंचवडचा बाहुबली हरपला, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
- “यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या”; सेनेचा नड्डांवर निशाणा
- “महाराज धर्मवीर असते तर काही लोकांनी कटकारस्थान करून औरंगजेबाच्या त्यांना स्वाधीन का केलं”
- अजित पवारांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “आता औरंगाबादचं संभाजीनगर नाही तर..”
- “नितेश राणेंना सोडा, अगोदर नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा”