मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सर्व मंत्री १ नोव्हेंबरला काळ्या फिती लावून काम करणार आहेत, त्यासंदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे, बेळगाव कारवार प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकार हि कृती करणार असल्याचं बोललं जात आहे. कारण १ नोव्हेंबरला कर्नाटक राज्याचा स्थापना दिन असल्याने महाराष्ट्र राज्य सरकार याचा निषेध करणार आहे.
मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकाने बेळगावचे नामांतर बेळगावी असे केले होते, तेव्हा महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते. महाराष्ट्रात त्याचा आक्रोश व्यक्त करण्यात आला होता. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बसगाड्यांवर जय महाराष्ट्र लिहिण्याचे फर्मान काढले होते. आता या निर्णयामुळे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मोठे पाडसाद उमटण्याची शक्यता आहे. कारण आता हा वाद राज्य सरकारच्या पातळीवर उमटणार आहे.
कर्नाटकातील #मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर करून त्यांच्या समर्थनार्थ १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सरकार मधील सर्व कॅबिनेट तसेच राज्य मंत्री काळी फीत परिधान करून काम करणार… @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @ChhaganCBhujbal pic.twitter.com/t6l8V33lm6
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 29, 2020
दरम्यान काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनेने सारवासारव करताना स्वतःची बचावात्मक भूमिका घेतली आहे. कारण सरकार शरद पवार नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच चालवतात असं वक्तव्य शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केल आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना भेटावे, असा सल्ला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिल्यानंतर शिवसेनेने या प्रकरणात सावध प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवारांना भेटायला सांगितले याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार शरद पवार चालवतात असा घेवू नये, असे मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री तसेच शिवसेनेचे प्रवक्ते उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यपालांनी मनसे अध्यक्षांना पवार साहेबांना का भेटायला सांगितलं? हे त्यांनाच माहीत. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हेदेखील मला माहीत नाही, त्यावर बोलणं योग्य नाही. त्यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आपण अर्थ लावू तसे वेगवेगळे अर्थ लागू शकतात.
Read Also :
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना निवेदनhttps://t.co/rcaIn97IPQ @miarjunkhotkar @ShivSena #bramhan
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020