मुंबई – “शरद पवार साहेबांना राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आली तर ते अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच करतील”, असे विश्लेषण करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खोचक टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याकडे पाहण्याची गरज नाही. आपली राजकीय उंची पाहूनच त्यांनी वक्तव्ये करावीत. असा चिमटा काढत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
महाविकासआघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले तसेच विरोधी पक्षावर देखील निशाणा साधत जोरदार टीकेबाजी केली. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त साधलेल्या संवादात गृहमंत्र्यांनी पोलीस भरती, शक्ती कायदा, अर्णब गोस्वामी अटक प्रकरण, विरोधकांचे आरोप या सगळ्यावर भाष्य केलं. वर्षभरात कोणत्या गोष्टी केल्या याची माहितीही त्यांनी दिली.
Read Also –
“फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं”
“फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका”
‘मग सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात, ही धमकी नव्हती का?’; फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला ना राज्यपालांची उपस्थिती ना मुख्यमंत्र्यांची..!