मुंबई – महाविकासआघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले तसेच विरोधी पक्षावर देखील निशाणा साधत जोरदार टीकेबाजी केली. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त साधलेल्या संवादात गृहमंत्र्यांनी पोलीस भरती, शक्ती कायदा यांसारख्या विषयावर भाष्य केले तसेच अर्णब गोस्वामी अटक प्रकरण यावर देखील भाष्य करत विरोधी पक्षावर हल्ला चढवला.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं. नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आलं, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
अर्णव गोस्वामी यांनी मला पैसे न दिल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट अन्वय नाईक यांनी लिहिली होती. या आत्महत्येनंतर मागच्या सरकारने अन्वय नाईक प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालयात मिटिंग घेतली होती. नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप देशमुख यांनी केला. पत्रकार अर्णव गोस्वामींना वाचवण्यासाठी नाईक आत्महत्या प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्या गेल्याचं नाईक यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही कारवाई सुरू केली आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितले.
Read Also –
“फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका”
‘मग सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात, ही धमकी नव्हती का?’; फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला ना राज्यपालांची उपस्थिती ना मुख्यमंत्र्यांची..!
“या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए”; फडणवीसांकडून ठाकरे सरकारची चिरफाड