मुंबई : ‘रेल्वेमध्ये गर्दी झाली तर प्रादुर्भाव होईल. टप्प्या टप्प्यात रेल्वे सुरु केली जात आहे. लोकांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. याचे राजकीय आंदोलन करू नये, राजकीय फायदा घेऊ नये’ अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेवर केली आहे.
आज मुंबईतील अनेक ठिकाणी मनसेकडून लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली . ” ज्याला कोणाला राजकीय स्वरुप द्यायचं असेल तर देऊ द्या. सर्व गोष्टींची काळजी करुन रेल्वे खुली करावी लागते. आधीच प्रादुर्भाव वाढतोय, रेल्वे खुली केली तर प्रादुर्भाव वाढेल. टप्प्या टप्प्याने आम्ही खुल्या करतोय, आता रेल्वेच्या फेर्या वाढवल्या आहेत, असं अनिल परब म्हणाले.
‘रेल्वेमध्ये गर्दी झाली तर प्रादुर्भाव होईल. टप्प्या टप्प्यात रेल्वे सुरु केली जात आहे. लोकांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. याचे राजकीय आंदोलन करू नये, राजकीय फायदा घेऊ नये. बस पेक्षा रेल्वेची प्रवासी संख्या जास्त आहे. रेल्वेची संख्या मर्यादित नाही. बसमधील गर्दी होत आहे यावर काही निर्बंध घेतले जाईल. लोकल सेवा कधी सुरू करायची याबतीत समीतीत निर्णय घेतला जाईल, असंही अनिल परब म्हणाले.
Read Also :