मुंबई : शिवसेनेच्या अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होत आहेत. मराठवाड्याचे नेते अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा खुप दिवसापासुन सुरू होती. आता त्यांनी आपण शिंदेगटाला समर्थन देत असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगलेच खिंडार पडले आहे. यातच आता अर्जुन खोतकर यांनी आपण लवकरच शिंदे गटात जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकाच नाण्याच्या दोन बाजू; अन् आदित्य ठाकरेंनी अजान सुरू असताना थांबवले भाषण
उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. सकाळी याविषयावर सविस्तर ठाकरे यांच्याशी बोललो आहे. माझ्यावर काय परिस्थिती बितत आहे ते सांगितले आहे. सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या आहेत याच नंतर मी हा निर्णय घेतला आहे. याचसोबत राऊत, विनोद घोसाळकर यांच्याशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. मी उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली. त्या संदर्भात जे काही बोलायचं ते बोललो आहे. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही तरी परिस्थिती आहे म्हणुन मी हा निर्णय घेतला नाही. यावेळी खोतकर भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.यानंतर मी शिंदे गटाचा भाग असणार आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले.
“बाळासाहेबांचा नातू, उद्धव ठाकरेंचा पुतण्या शिंदेंच्या भेटीला”; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
मी आधी चार वेळा फोन केला. व्हॉट्सअप कॉलवरून बोललो. ईडीची पिडी जाईल हे मी कसं सांगू शकतो, मी सहारा शोधला, थोडाफार तरी सहारा मिळेल. विधान परिषद वगैरै मी अट ठेवली नाही. ही अफवा आहे. मी एकाही शिवसैनिकाला माझ्यासोबत या असं सांगितलं नाही. मी उद्धव ठाकरेंबद्धल काहीच बोलणार नाही. 40 वर्षे मी पक्षात काम केलं आहे. मी उपनेतेपदाचा राजीनामा देणार आहे, असा मेसेज टाकला आहे. एखाद्या प्रसंगाने भेटायची वेळ आली तर मातोश्रीवर ही जाईल, असं अर्जुन खोतकर म्हणाले.
“त्यामुळे ओबीसी हा सत्तेच्या अन् प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल”; शरद पवारांना चिंता
रावसाहेब दानवेंनी मला चहा घ्यायला बोलावले होते. अडीच वर्षाने त्यांनी मला बोलावले. ते म्हणाले अर्जुनराव काय करताय. मी म्हटले मला लोकसभा लढायची आहे. ते म्हणाले सोडता येणार नाही ता जागा आमची आहे. मी म्हणालो ही निर्णय शिंदे फडणवीसांवर सोडा. आता हा निर्णय शिंदे फडणवीसांकडे आहे. मी आग्रह सोडलेला नाही. असं रावसाहेब दानवेयांच्या भेटीविषयी खोतकर म्हणाले.
Read also
- “राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज”; उद्धव ठाकरेंचा राज्यपालांना टोला
- “दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा राज्यपालांनी चांगला चंग बांधलाय”; राष्ट्रवादीचा भाजपला टोला
- “नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये”; मनसेचा राज्यापालांना इशारा
- “मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला तर…;” राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांचा इशारा
- जिद्द बाळगणाऱ्या ३१४ अपंगांना लक्ष्मण जगताप व बंधू शंकर जगताप यांचा हात मदतीचा; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप