मुंबई : पुढील काही दिवस मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनाची धग कायम राहणार आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा २४ तारखेपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. २४ ते २९ तारखेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात येणार असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन काळातील सहकारी किर्तनकार अजय बारसकर महाराज यांनी जरांगे पाटलांवर धक्कादायक आरोप लावले आहेत. त्यामुळे राज्यात मराठा विरूद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र सध्या राज्यात निर्माण झालं आहे.
हेही वाचा..मराठा विरूद्ध मराठा संघर्षाला सुरूवात ? “जरांगे खोटारडा माणूस, त्यांनी फसवलंय,” जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप
अजय बारसकर म्हणाले की, मी मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकत आहे. मराठवाड्यात कुणबी शोधण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतो. त्यामुळे मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जोडलो गेलो. परंंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासह काम करतांना त्यांची हेकेखोर वृत्ती हळूहळू समजू लागली. सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये मी जरांगे पाटील यांना मसुदा वाचून त्यातील बारकावे लक्षात आणून देण्याचे काम करत होतो. एकदा त्यांनी माझा महाराज असा जाहीर उल्लेखही केलेला आहे. पण त्यांचे खरे रूप समोर आल्यामुळे मी आता जनतेसमोर येऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
मनोज जरांगे पाटील हे अंहकारी आहेतच पण त्यांच्या मुलांमध्येही हा अंहकार भरून राहिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना जरांगेंच्या मुलीने म्हटले की, माझ्या वडिलांनी देवालाही झुकायला भाग पाडले आहे. त्या लहान मुलीने उच्चारलेले हे वाक्य जरांगेंच्या अहंकाराच्या शिकवणुकीतून आले आहे. जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यापासून माझ्यावर फुटीरतेचे आरोप लावले जात आहेत. मी सरकार आणि भुजबळ यांचा एजंट असल्याचे सांगितले जात आहे. परंतु मी भाजप अन् भुजबळांवर जाहीर टिका केलीय. भुजबळ माझे मित्र नाहीत. माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…अमोल कोल्हेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला, म्हणाले, “त्याची भरपाई देणार का?”
मराठा आरक्षणाबाबत अजय बारसकर महाराज यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांच्या सगळ्या गोष्टी त्यांनी उघड केल्या आहेत. यावेळी बारसकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना पाटील म्हणणार नाही, कारण जरांगे हेकेखोर आहेत. यातच गोळ्या घालून ठार मारू असे मला धमकीचे फोन येत असल्याचा दावा देखील बारसकर यांनी यावेळी केला आहे. जरांगेंनी तुकाराम महाराज यांचा अपमान केला, तो मी सहन करणार नाही. असेही त्यांनी सांगितले.
काही वेळात अध्यादेश निघतो का ? जरांगे पाटलांना काडीचीही अक्कल नाही. १५ मिनिटात अधिसूचना द्या म्हणतो. त्याला अर्थवट ज्ञान आणि त्याचं हे ज्ञान बेक्कार असल्याची टिका देखील त्यांनी केलीय. याचसोबत लोणावळा आणि वाशीत समाजाला वगळून जरांगेंनी बैठक घेतली होती. त्याआधी २३ डिसेंबरला देखील बैठक झाली होती. रांजणगाव येथे काही अधिकाऱ्यांसोबत जरांगेंनी गुप्त बैठक घेतली होती. असा पाच बैठका घेतल्याचा आरोप बारसकर यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..सुप्रिम कोर्टाचा भाजप सरकारला दणका..! चंदीगड महापौर निवडणूक गैरव्यवहार प्रकरण
हेही वाचा..अजय बोरसकर हा भोंदू महाराज, सरकारचा ट्रॅप, जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“कांदा निर्यात बंदीचा निर्णय फसवा,” विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारसह केंद्रावर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…जरांगेंना काडीचीही अक्कल नाही, सहकारी मित्राचाच जरांगे पाटलांवर जोरदार घणाघात
हेही वाचा…जरांगे पाटलांचा सरकारच्या विरोधात पुन्हा एल्गार, तारिख अन् स्थळ ठरलं, सर्वात मोठं आंदोलन होणार