नवी दिल्ली : चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय रद्द ठरविण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने आप-कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विजयी ठरविले आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपला मोठा फटका बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला निवडणुक अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. निवडणुक अधिकारी अनिल मसिह यांनी छेडछाड केलेल्या व अवैध ठरविलेल्या ८ मतपत्रिकांमध्ये कुलदीपकुमार यांना मते मिळाली होती. हे सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिका व निवडणुक प्रक्रियेच्या चित्रीकरणाच्या पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळे मसिह यांच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…अमोल कोल्हेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला, म्हणाले, “त्याची भरपाई देणार का?”
चंदीगड महापौरच्या निवडणुकीत निवडणुक अधिकारी अनिल मसिह यांनी छेडछाड केल्याचा व्हिडीओ काही दिवसापासून समाज माध्यमांवर फिरत होता. यावरून विरोधकांनी भाजवर सडकून टिका केली. तर याप्रकरणी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता याठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलाय. ८ मते अवैध ठरविल्यानंतदर भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषीत केले होते. भाजप उमेदवार मनोज सोनकर यांना १६ तर आप-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांना १२ मते मिळाली होती. आप- कॉंग्रेसचे संख्याबळ अधिक असतानाही असा निकाल दिल्याने न्यायालयात दाद मागितली होती.
हेही वाचा…शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जची राजधानी होतंय का ? दोन दिवसात तब्बल ४००० कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त
महापौरच्या निवडणुकीनंतरही काही राजकीय घडामोडी घडल्या. मनोज सोनकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. तर आपच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकरांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने देशात लोकशाही अस्तित्वात आहे. याचा दाखलाच मिळाला आहे. चंदीगड महापौर निवडणूकीत पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकांमध्ये केलेल्या छेडछाडीबद्दल कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आहे. या निकालातून हेच दिसून येतंय की, सुप्रीम कोर्टाने भाजप सरकारच्या मुजोरी आणि लबाडीला लगाम घातला आहे. ही तर सुरुवात आहे आणि आता यापुढे आगामी निवडणुकीत जनता या अन्यायी सरकारला आणि दडपशाहीला कायदेशीर मार्गाने उत्तर देईल हे निश्चित. असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
लोकशाही जिंदाबाद..!
सुप्रीम कोर्टाच्या निकालाने देशात लोकशाही अस्तित्वात आहे याचा दाखलाच मिळाला आहे. चंदीगड महापौर निवडणूकीत पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकांमध्ये केलेल्या छेडछाडीबद्दल कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आहे.
या निकालातून हेच दिसून येतंय की, सुप्रीम कोर्टाने… pic.twitter.com/IBs2fLeJc8
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा..अजय बोरसकर हा भोंदू महाराज, सरकारचा ट्रॅप, जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“कांदा निर्यात बंदीचा निर्णय फसवा,” विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारसह केंद्रावर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…जरांगेंना काडीचीही अक्कल नाही, सहकारी मित्राचाच जरांगे पाटलांवर जोरदार घणाघात
हेही वाचा…जरांगे पाटलांचा सरकारच्या विरोधात पुन्हा एल्गार, तारिख अन् स्थळ ठरलं, सर्वात मोठं आंदोलन होणार
हेही वाचा..मराठा विरूद्ध मराठा संघर्षाला सुरूवात ? “जरांगे खोटारडा माणूस, त्यांनी फसवलंय,” जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप