मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला आहे. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुद संपण्यापुर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्यावरून आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
हेही वाचा…अजित पवारांचा पुतण्या ‘सुप्रिया सुळें’चा प्रचार करणार, बारामतीत राजकीय संघर्षाला सुरूवात
स्वतःच्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी हटवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वतः श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याचे आता उघड झाले आहे. गाजावाजा करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता का ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसेच निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही. सद्या:स्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. असे केंद्राकडून सांगण्यात आलेले आहे. असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.
हेही वाचा…शरद पवारांनी सुनील तटकरेंच्या विरोधात डाव टाकला, तटकरेंच्या भावालाच दिली मोठी जबाबदारी
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुक पूर्ण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे आव आणणे आता भाजपने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे राजकारण करण्याकडे भाजपने लक्ष द्यावे.
स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे आव आणणे आता भाजपने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे राजकारण करण्याकडे भाजपने लक्ष द्यावे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 21, 2024
READ ALSO :
हेही वाचा…जरांगेंना काडीचीही अक्कल नाही, सहकारी मित्राचाच जरांगे पाटलांवर जोरदार घणाघात
हेही वाचा…जरांगे पाटलांचा सरकारच्या विरोधात पुन्हा एल्गार, तारिख अन् स्थळ ठरलं, सर्वात मोठं आंदोलन होणार
हेही वाचा..मराठा विरूद्ध मराठा संघर्षाला सुरूवात ? “जरांगे खोटारडा माणूस, त्यांनी फसवलंय,” जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप
हेही वाचाअमोल कोल्हेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला, म्हणाले, “त्याची भरपाई देणार का?”
हेही वाचा…शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जची राजधानी होतंय का ? दोन दिवसात तब्बल ४००० कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त