नागपूर : देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आण समाधानाने नांदत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हिंदुत्व सहिष्णू आहेत म्हणूनच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तसेच हिंदू बहुसंख्य असणाऱ्या देशात असदुद्दीन ओवेसी काहीही बोलू शकतात. तरीही ओवेसींवर हल्ला होत नाही. यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते. हैदराबादच्या निवडणुकीसाठी ओवेसी सध्या काहीबाही बोलत आहेत. मात्र, त्यांना याचा फायदा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून यश मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पदवाधीर मतदारसंघाच्या मिशनवर आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात सहा ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.
Read Also :
मोदी सरकारने ‘सीबीआय’ची पानटपरी केली आहे, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याची टीका
तृणमूल काँग्रेसचे ५ खासदार भाजपप्रवेशाच्या तयारीत, ‘या’ भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ
…म्हणून आमदार रोहित पवारांनी शाळकरी मुलांना धीर देत दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री ठाकरेंना बॉलिवूडची तर आदित्य ठाकरेंना पब,बारची चिंता, आशिष शेलार बरसले…