पुणे : महाराष्ट्रात राज्य सरकार ताळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणत असताना भाजप करत असलेल्या मागण्यांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना आता यावरूनच भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात ताळेबंदीच्या शिथिलतेवरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बॉलिवूडची तर आदित्य ठाकरेंना पब, बारची चिंता आहे असा आरोप शेलार यांनी केला आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्तानं शेलार पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली. मतदारांवर अविश्वास दाखवणाऱ्या महविकास आघाडीचा प्रचाराचा, नेत्याचा आणि उमेदवाराचा त्यांनी निषेध केला. ठाकरे सरकारनं राज्याची जी दयनीय अवस्था केली आहे.
त्या विरोधात मतदारांनी मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं. ‘हे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे. शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. शिक्षणाबाबत सावळागोंधळ आहे. कुठलीही मागणी केली की हे लोक केंद्र सरकारकडं बोट दाखवतात. मराठा आरक्षणचा विषय निघाला की सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवतात. मंदिर उघडा म्हटले की हे मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट दाखवतात. पब, बार आणि रेस्टॉरंट उघड्याण्याच्या आधी मंदिरं उघडा, ही मागणी अवास्तव नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्यामुळे मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावरून पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, याच मुद्यावरून ठाकरे सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?, असे ट्विट करत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
Read Also :
ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी राजीनामा देऊन ‘क्लार्क’चं काम करावं, ‘या’ भाजप नेत्याची जोरदार टीका
आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर राज्यपाल लवकरच निर्णय घेतील: छगन भुजबळ
कराची स्वीट्स; नितीन नांदगांवकर यांच्यावर संजय निरुपम यांची टीका, म्हणाले..
विरोधकांकडे लक्ष न देता महापालिका निवडणुकिसाठी अधिक जोमाने कामाला लागा -उद्धव ठाकरे
‘हे’ नागपूरला यायला घाबरतात, मग दिल्लीला काय जाणार? ; बावनकुळेंचा सरकारला टोला
देशाला विभागण्यासाठी भाजपकडून ‘लव्ह जिहाद’ शब्दाची निर्मिती, काँग्रेसची टीका