रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला पेच अखेर सुटला असून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिलीय. त्यांचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. मात्र नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली आहे. नारायण राणेंना उमेदवारी जाहीर होतात शिंदे गटातील युवासेना जिल्ह्याप्रमुखांनी राजीनामा दिल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…“बारामतीला लीड मिळणार की नाही, ते बारामतीकर सांगतील”, अजितदादांनी लोकसभेसाठी ठोकला शड्डू
सुरूवातीला या मतदारसंघातून शिंदे गटातील किरण सामंत निवडणुक लढण्यासाठी इच्छूक होते. सामांतांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. मात्र अचानक भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव पुढे करत मतदारसंघावर दावा ठोकला. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. त्यावर राणेंना उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटातील युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात याची सध्या एकच चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा..” ही माझी शेवटची निवडणूक आहे”, मतदारांना आढळरावांनी घातली भावनिक साद
दरम्यान, आज नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे. त्याआधी याठिकाणी निवडणुकीत तीन ते चार लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होणार असा विश्वास यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केलाय. तर दुसऱ्या बाजुला विनायक राऊतांनी देखील राणेंवर घणाघात करत तिसऱ्यांदा त्यांचा पराभव होईल. असा विश्वास व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…धाराशिव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
हेही वाचा…लोकशाहीच्या महापर्वाला आजपासून सुरूवात, राज्यात पाच मतदारसंघात आज मतदान
हेही वाचा…मोहोळांच्या प्रचारात मनसे सक्रीय ; भाजपा मनसे पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक संपन्न
हेही वाचा…“मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’, विरोधकांची टिका, अजितदादांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…