मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला ऊत आला आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या खालोखाल भाजपचे क्रमांक दोनचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. शिवसेनेकडून सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
आधी गोळ्या घातल्या, नंतर कुऱ्हाडीचे वार; शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या
भाजपकडून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपने आमदार आशिष शेलार यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर २५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आमदार आशिष शेलारांना मोठी जबाबदारी भाजपकडून देण्यात आली आहे. आशिष शेलार हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांना भाजपने बढती दिल्यानंतर लगेचच त्यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे आणि शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे.
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीत दाखल
गेली २५ वर्षे मुंबईकर भोगत असलेल्या यातनांचा आता कडेलोट झालाय..बदल व्हायलाच हवाय..लढाई आता सुरु! चला मुंबईकर जिंकण्यासाठी आपण लढू!!” असे टि्वट आज सकाळी आशिष शेलार यांनी केलं आहे. या ट्विटद्वारे शेलारांनी एकप्रकारे शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्ष जबाबदार दिली आहे. मागच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मुंबईत ८०च्या वर जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत सत्ता आण्यासाठी शिवसेना विरुद्ध भाजप आता आमने सामने ठाकले आहेत.
Read also:
- म्हापश्यात खरी लढत डिसुझा-कांदोळकर यांच्यातच
- मुंबईत सत्ता खेचून आण्यासाठी भाजपची वजीर चाल; आमदार आशिष शेलारांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
- म्हापसा मतदारसंघात जोशुआ यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित – नाईक
- मायकल लोबो वैफल्यग्रस्त झाल्यानेच भाजपच्या नेत्यावर टीका करत आहेत – उर्फान मुल्ला
- पुण्यातील निवडणूकची पहिली झलक: बॅनरबाजीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा