मुंबई: विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाने गाजला. दुसऱ्या आणि अंतिम दिवशी काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाआधीच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगलं. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री बोलणार का? याकडेही लक्ष आहे. आमदारांच्या निलंबनाच्या मुद्यावरून दुसऱ्या दिवशीचं कामकाजही तापलेलं राहण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा: भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?
हे पण वाचा: मराठा आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राचाच, भाजपाकडून मराठा समाजाची दिशाभूल -नाना पटोले.
सोमवारी नेमकं काय घडलं होतं?
केंद्र सरकारनं राज्याला मागासवर्गाची माहिती त्वरीत उपलब्ध करून द्यावी, अशी शिफारस करणारा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधिमंडळात मांडला. याला विरोध करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “हा प्रस्ताव आला तर विरोधीपक्ष त्याला पाठिंबाच देईल. पण यातून काही साध्य होणार नाही. हा राजकीय प्रस्ताव आहे.” तर, ओबीसी आरक्षणाचा ठराव हा आरक्षण देण्यासंदर्भात करण्यात यावा. पण हा ठराव जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
हे पण वाचा: धक्काबुक्की, धमक्या देणे , शिवीगाळ करणे याला माज म्हणतात, सचिन सावंत यांची भाजपवर टीका
हे पण वाचा: भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?
त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला. भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना हा प्रकार घडल्याचं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं.