मुंबई : संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागून राहिलेल्या बहूप्रतिक्षीत अश्या राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा ठराव मंजुर होत असताना अभूतपूर्व गोंधळ झाला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. यामुळे आक्रमक पवित्रा घेत सर्व निलंबित आमदारांनी, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे.
सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; भाजपच्या तब्बल १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना, भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी काही आक्रमक आमदारांनी, पुढे हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. एका आमदाराने तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. या गदारोळात धक्काबुक्की देखील झाली असल्याचा आरोप विरोधकांवर करण्यात आला असून, परिणामी या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेनंतर या सर्वच्या सर्व निलंबित आमदारांनी राज्यपालांसमोर, पत्राद्वारे वस्तुस्थिती मांडली आणि दाद मागितली.
OBC आरक्षणावर आक्रमक झालेल्या भाजपाच्या आमदारांचा आवाज दडपण्यासाठी वसूली सरकारने भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले. या दंडेली विरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची राजभवन येथे भेट घेतली. pic.twitter.com/C2EIBM5jwo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2021
यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, आमदार आशिष शेलार यांनी, “सरकारने केलेल्या कारवाईचा आणि आरोपांचा अहवाल मागवा अशी मागणी, आम्ही राज्यपालांना केली आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया तपासून, योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं आहे. आमच्याकडून सभागृहातच नाही, तर इतर कुठेही अपशब्द उच्चारला गेला नसून, झालेली कारवाई ही पूर्णपणे एकतर्फी आहे. आमचं म्हणणंच आम्हाला मांडू दिलं जात नाहीये. काही जणांकडून समाज माध्यमांवर पसरवल्या जात असलेल्या व्हिडीओतही, वादग्रस्त आणि अपमानसास्पद असं काहीही झालेलं दिसून येत नाहीये,” असा दावा केला आहे.
भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यासाठी ठाकरे सरकारचा पुर्वनियोजित कट
तसेच, ठाकरे सरकारने आज लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढली असून, या कारवाईमुळे आता ओबीसी समाजाच्या भाजप देत असलेल्या लढाईला अजून वेग येणार आहे. मात्र, तासभर चर्चा करुन १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?,” असा सवाल उपस्थित करत शेलार यांनी, “शेलार यांनी, “आता राज्यपालांपुढे खरे काय ते सांगितल्यावर आणि उचित कारवाई केली जाईल या त्यांच्या आश्वासनानंतर, आम्ही समाधानी आहोत,” असं त्यांनी म्हटलं आहे.
१२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपची तातडीची बैठक; राज्यपाल कोश्यारींची घेणार भेट
दरम्यान, राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी या १२ आमदारांची संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांच्या निर्णयांनंतर ठराव संमत करून निलंबन करण्यात आले असून, या सर्व आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे, आता या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूरमधल्या अधिवेशनात सहभाग घेता येणार नाहीये.
निलंबित केलेले १२ आमदार…
संजय कुटे
आशिष शेलार
अभिमन्यू पवार
गिरीष महाजन
पराग अळवणी
राम सातपुते
हरिश पिंगळे
भातखळकर
जयकुमार रावल
नारायण कुचे
बंटी भांगडिया
योगेश सागर
Read Also :
- “हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा”, चित्रा वाघ यांचा इशारा
- “लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध”, “हिटलरशाही नही चलेगी”च्या नाऱ्यांनी दणाणला विधानसभेचा परिसर
- “आजची शिवीगाळ, धक्काबुक्की ही फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली झाली”- नवाब मलिक
- भाजपचे आमदार सभागृहात धमकी देत आहेत; नाना पटोलेंचे गंभीर आरोप
- भाजप आमदारांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या – तालिका अध्यक्षांचा खळबळजनक आरोप