मुंबई : विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी व्हावं म्हणून आमच्या आमदारांना सस्पेंड करण्यात आलं आहे. आमचे आमदार निलंबित करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Interacting with media in Vidhan Bhavan #MonsoonSession https://t.co/095NJExxRu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 5, 2021
बेशिस्त वर्तनाच्या कारणावरून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. सरकारमुळे आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिलं. त्यामुळे आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आमच्या आमदारांना निलंबित केलं जाईल, ही माझी शंका होती. ती खरी झाली. ओबीसींसाठी १२च आमदार काय आम्ही १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही लढा देत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
ओबीसी आरक्षणासाठी १२ नव्हे तर भाजपच्या संपूर्ण १०६ आमदारांना निलंबित केले तरी आम्ही मागे हटणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा लढा सुरूच राहणार. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Dr.Sanjay Kute- डॉ.संजय कुटे (@DrSanjayKute) July 5, 2021
राज्य सरकारने उद्या माझ्यावर हक्कभंग आणला तरी चालेल. पण सांगतो. एक स्टोरी तयार करण्यात आली होती. त्यानुसार आमच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं. आमच्या एकाही आमदाराने शिवीगाळ केली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेच्या सदस्यांनीच धक्काबुक्की दिली. त्यावर भाजपचे आमदार आक्रमक झाले. आमच्या आक्रमक आमदारांना आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. उलट आशिष शेलार यांनी या सर्व आमदारांच्या वतीने अध्यक्षांची माफी मागितली. त्यांची गळाभेटही घेतली. तो विषय संपल्यावर आम्ही बाहेर आलो होतो. पण आमच्या आमदारांना सस्पेंड करण्यासाठी सरकारच्या मंत्र्यांनी स्टोरी रचली, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले ..
आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो.@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra— Ram Satpute (@RamVSatpute) July 5, 2021
आमच्या सर्वच्या सर्व आमदार निलंबित केले तरी चालेल, आमचा लढा चालूच राहिल. ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहू. आम्हाला निलंबीत केले तरी आमचे नेते देवेंद्र फडणवीस एकटे लढा देतील, सगळ्यांची सळो की पळो करून ठेवतील, अशी प्रतिक्रीया आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
Read Also :
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा, ठाकरे सरकारकडून विधानसभेत ठराव मंजूर
- केंद्र सरकार एम्पिरिकल डाटा देत नाही; विधानसभेत ठरावावरून फडणवीस-भुजबळ आमने-सामने
- विधानसभेत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत, उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!
- ED च्या कचाट्यात सापडलो म्हणून पळून जाणार नाही; प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर
- ठाकरे सरकारकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम, देवेंद्र फडणवीस आक्रमक