मुंबई : एमपीएसी करणाऱ्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने, “राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे यात पडू नका. जमले तर हे इतरांपर्यंत पोचवा, अनेक जीव वाचतील,” अशा आशयाचे पत्र लिहून आत्महत्या केली. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून, यावरून आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर, यावर भाष्य करताना विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “एमपीएससीच्या रिक्त असलेल्या जागा ३१ जुलैपर्यंत भरण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक होईल. त्यानंतर तातडीने या जागा भरण्याचा निर्णय होऊन त्या भरल्या जातील, अशी माहिती दिली आहे. काल झालेल्या स्वप्नील लोणकरच्या दुर्दैवी आत्महत्येनेनंतर विरोधकांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी ही घोषणा केली आहे.
सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं; MPSC वाल्या विद्यार्थ्यांचे तीन तेरा वाजले – फडणवीस आक्रमक
तसेच, स्वप्नील लोणकर यांच्या कुटुबीयांना ५० लाखांची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरली आहे, तर या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, त्याची दखल घेणे गरजेचे आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, एमपीएससीच्या तब्बल 3 हजार नियुक्त्या, मुलाखती रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, ३ वर्षांपासून राज्य सेवा परीक्षा-२०१९ सोबत स्थापत्य अभियांत्रिकी, पशुधन विकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २९९६ पदांसाठी हजारो उमेदवारांच्या मुलाखती आणि मुख्य परीक्षा रखडल्या आहेत, याचे परिणाम लाखो उमेदवारांना भोगावे लागत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला.
Read Also :
- ED च्या कचाट्यात सापडलो म्हणून पळून जाणार नाही; प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर
- ठाकरे सरकारकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम, देवेंद्र फडणवीस आक्रमक
- पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना दोन दिवस पुरेशे
- शिवसेनेशी वैचारिक मतभेद, शत्रुत्व नाही, युतीचा निर्णय योग्य वेळी घेऊ; फडणवीसांचे सूचक विधान
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेला दांडी, रिकामी खुर्ची असलेल्या फोटो व्हायरल