मुंबई : राज्यात आज ५ आणि उद्या ६ जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेशी वैचारिक मतभेद, शत्रुत्व नाही, युतीचा निर्णय योग्य वेळी घेऊ; फडणवीसांचे सूचक विधान
दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेला दांडी, रिकामी खुर्ची असलेल्या फोटो व्हायरल
विधानसभेत प्रलंबित विधेयक – शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या गुन्ह्यांसाठी महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक, २०२० आणण्यात आले. याअंतर्गत महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.
प्रथेला फाटा देत अधिवेशन पूर्वेसंध्येला मुख्यमंत्र्याने पत्रकार परिषद टाळली, राज्यात चर्चेला उधाण
पावसाळी अधिवेशनादरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
Read Also :
- कर्मवीर शंकरराव काळे साखर सहकारी कारखान्याला अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे ‘प्रशस्तीपत्रक’
- मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येणार का?, त्या आईचा आक्रोश
- नियम झुगारून सोलापूरात मराठा मोर्चा; आमदार समाधान औताडे पोलिसांच्या ताब्यात
- राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी; महादेव जानकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- शिवसेना-भाजप एकत्र येणार?, अशिष शेलारांच्या भेटीवर संजय राऊत म्हणतात…