पुणे : ”एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर त्यांना जाग आली असती की नाही. दुसऱ्याच्या जीवाचा सुद्धा विचार करावा. आज आमच्यावर काय परिस्थिती आली. आम्ही त्याला मोठे केले त्याला शिकवले. आज नोकरी मिळण्या आधीच सरकारने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. फक्त यांची भांडणे, जगात काय चालले याचे यांना काही देणेघेणे नाही, फक्त राजकारण आणि राजकारण. माझा मुलागा माझ्याशी बोलत होता. तो म्हणायचा आई माझी मुलाखत झाली नाही. गरीबांच्या मुलांचे यांना काही देणेघेणे नाही. त्यांची मुले आहेत सुरक्षीत, अशा शब्दात एमपीएसी करणाऱ्या स्वप्पीलने केलेल्या आत्महत्त्येवर त्याच्या आपला आक्रोश व्यक्त केला.
अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे यात पडू नका. जमले तर हे इतरांपर्यंत पोचवा, अनेक जीव वाचतील, असा उल्लेख करीत स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असतीतर, त्यांना आत्महत्येचे दुःख काय असते ते समजे असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईने व्यक्त केली आहे.
महामारी हद्दपार होतीये! पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद!
दरम्यान, स्वप्नील लोणकर हा एमपीएससीची २०१९ ची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यामुळे तो तणावात होता. त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. ती पूर्व परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. एमपीएसीसीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने तो तणावात होता. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावू शकत नाही, या तणावातून स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या परीक्षा व नोकऱ्यांबाबतच्या राज्य सरकारच्या चालढकलीच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Read Also :
- राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी; महादेव जानकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- शिवसेना-भाजप एकत्र येणार?, अशिष शेलारांच्या भेटीवर संजय राऊत म्हणतात…
- सरकार पाडण्यासाठी चंद्रकांतदादांनी अमित शहांना पत्र लिहिलं – रोहित पवार
- …तर शिवसेना पुन्हा भाजप सोबत युती करणार; सुधीर मुनगंटीवारांचा दावा
- राज्याच्या राजकारणात होणार उलथापालथ? संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात मुंबईत गुप्त बैठक