मुंबई : राज्यातील राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिक भेट घेतली होती. या भेटीनंतर शिवसेना-भाजपा यांच्यातील दुरावा कमी झाला असून पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली. त्यातच राज्यात भेटीगाठीच्या बातम्यांनी या चर्चेला आणखी वाव मिळाला.
पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेडया!
भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली अशी बातमी शनिवारी माध्यमांमध्ये पसरली. या बातमीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं की, माझी कोणासोबतही भेट झाली नाही. काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांना एका कार्यक्रमात भेटलो होतो. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांना भेटतो, राजकारण म्हणजे हिंदूस्तान आणि पाकिस्तान नाही. त्यामुळे राजकारणात भेटीगाठी होत असतात असा खुलासा त्यांनी केला आहे.
“मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते, औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी”
त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही, अफवेमुळे राजकारण हलणार नाही. माझ्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. गोंधळ करणं म्हणजे रणनीती नाही. माझ्या बोलण्यानं, लिहिण्यानं त्रास झाला म्हणून अफवा पसरवल्या जातात. जनतेचे विषय मांडा, सभागृहात चर्चा करा. जेवढ्या अफवा पसरवाल तेवढं आम्ही मजबूत होऊ, माझ्यामुळे अडचणी निर्माण होणारे अशा अफवा पसरवत आहेत असा टोला संजय राऊतांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.
आमदार रवी राणांवर होणार कारवाई? उद्घाटन कार्यक्रमाला नियम पायदळी तुडवून केली तोबा गर्दी
दरम्यान, अफवा पसरवल्यामुळे राजकारण अस्थिर होत नाही. अफवा पसरवणारे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील. विधानसभा अध्यक्षपदाबाबत जे मुख्यमंत्री बोलतील तेच आमचं मत आहे. राज्याच्या हिताचे अनेक मुद्दे आहेत त्यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे. विरोधकांनी पूर्णवेळ कामकाज चालू दिलं पाहिजे. विरोधकांना महाराष्ट्राची काळजी असेल. ते स्वत:ला महाराष्ट्राचे समजत असतील तर त्यांनी कामकाज सुरळीत पार पाडायला हवं. २ दिवसीय अधिवेशन गोंधळात वाहू देऊ नये ही जनतेची इच्छा आहे. लसीकरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी यावर चर्चा करा असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
Read Also :
- सरकार पाडण्यासाठी चंद्रकांतदादांनी अमित शहांना पत्र लिहिलं – रोहित पवार
- …तर शिवसेना पुन्हा भाजप सोबत युती करणार; सुधीर मुनगंटीवारांचा दावा
- राज्याच्या राजकारणात होणार उलथापालथ? संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात मुंबईत गुप्त बैठक
- “पाच वर्षांत भाजपने काय मोठे दिवे लावले, चंद्रकांत पाटलांनी याचं उत्तर द्यावं”
- खनीजकर्म महामंडळांच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा? राष्ट्रवादीच्या नेत्याची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी