पुणे : सध्या वारकरी संप्रदाय पायी वारीच्या मागणीवरून आक्रमक झालेला आहे. मागच्या वर्षीही वारी महामारीच्या सावटाखाली होती. यावेळीही हा सोहळा महामारीच्याच सावटाखाली साजरा होणार आहे. मात्र, राज्य सरकारकडून यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे, मात्र पायी वरील घेऊन वारकरी संप्रदाय आग्रही आहे. त्यामुळे वारकरी आणि राज्य सरकार असा संघर्ष राज्यात सुरु आहे.
चंद्रकांतदादा म्हणातात, ‘‘भाजपतल्याही काही नेत्यांचीही चैाकशी व्हायला पाहिजे’’
दरम्यान, राज्य सरकारने पायी वारीसाठी घातलेले निर्बंध आणि आदेश झुगारून देऊन, पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज नजरकैदेत ठेवले आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेताच, दिघीजवळच्या संकल्प गार्डन मंगल कार्यालयाबाहेर, बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती.
मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्याचाच – श्वेता महाले
मात्र, आता या सगळ्या घटनाक्रमांनंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी, आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळत असून, “बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही? आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी परिणाम भोगायला तयार रहावं,” असा धमकी वजा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच, “औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आणि जुलमी आहे. मुघलांनीसुद्धा वारकऱ्यांचे एवढे हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका हातात घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवताना दिली आहे.
Read Also :
- गोकुळ मध्ये सत्ता बंटी पाटलांची मात्र सर्व ठेकेदारी महाडिकांची
- बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेडया!