मुंबई : राज्याच्या खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदांवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बोट ठेवले असून, या कामांची चौकशी चौकशी करावी आणि निविदा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, हे पत्र एका वृत्तवाहिनीने उर्जा विभागासंदर्भातले समजून एक बातमी प्रसारित केली आणि त्या चुकीने हे पत्र आणखीन प्रसिद्धीस आले आहे. मात्र, यावर नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी, हे पत्र ऊर्जा विभागाशी संबंधित नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे, हे पत्र नेमके कोणत्या विभागाशी संबंधित आहे, असा प्रश्न पडू लागला होता.
नाना पटोलेंच्या पत्रावर नितीन राऊतांकडून मोठा खुलासा, म्हणाले…
हा विषय खनिकर्म विकास महामंडळातील टेंडर प्रक्रियेबाबत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले गेले त्या विषयावर मी मा. मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. यात उर्जा विभागाशी काहीही संबंध नाही.
एबीपी माझा चॅनलनी उगाचच कॉंग्रेस मध्ये, माझ्या व नितीन राऊत मध्ये भांडण लावणे हे बरोबर नाही. pic.twitter.com/we8zWpBRF2
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 1, 2021
दरम्यान, याचे उत्तर मिळाले असून, शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अखत्यारित हे खाते येत असल्याचे कळते आहे. त्यामुळे, नाना पटोलेंच्या या ‘लेटरबॉम्ब’मधून शिवसेनेच्या एका मंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या खात्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात त्यांनी, “नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा व कोळसा वॅाशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या प्रक्रियेत रखुमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, खनिकर्म महामंडळाने पत्र पाठविले होते. यासंबंधी एक तक्रार दाखल झाली आहे. ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून, या कंपनीचे कुठलेही नेटवर्थ, टर्नओवर आणि सेक्युरिटी क्लीअरंनस नाहीत,” असे सांगितले आहे.
नितीन राऊत माझ्यात भांडण लावणे बरोबर नाही! चुकीची बातमी दाखवल्यानंतर नाना पटोले संतापले…
तसेच, “या कंपनीला कोळसा वॅाशिंग करण्याचाही कसला अनुभव नाही. ज्या कंपनीसोबत त्यांनी संयुक्त भागीदारी केली आहे, ती ट्रीब्युनलने काळ्या यादीत टाकली आहे. त्यामुळे, खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदेत गैरव्यवहार झाला असून, ठराविक लोकांनाच कामे दिली जात आहेत. रखुमाई कंपनीच्या निविदेच्या कुठल्याही अटी व शर्थींची पूर्तता केलेली दिसत नसून, तरीही या कंपनीला या गैरमार्गाने कामासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे, हे प्रकरण नियमबाह्य व आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करुन, त्याला स्थगिती देण्यात द्यावी,” अश्या आशयाचं पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे.
Read Also :
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
- जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- “केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळणे; हा मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का”