मुंबई: प्रसिध्द मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझा कडून उर्जा विभागा संदर्भात एक बातमी प्रसारित करण्यात आली होती. यावर कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले आहेत. महाराष्ट्र कॉंग्रेसने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
“एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची दाखवलेली बातमी ही पूर्णपणे असत्य व चुकीची आहे. आपण ऊर्जा विभागाशी संबंधित पत्र लिहिले नसून ते पत्र खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे. आणि या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही. एपीबी माझाच्या चुकीच्या बातमीचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, ऊर्जा विभागाविरोधात पत्र लिहिल्याची खोटी बातमी दाखवून आमच्याच पक्षाचे मंत्री नितीन राऊत आणि माझ्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला, हे जबाबदार वृत्तवाहिनीला शोभणारे नाही.
हा विषय खनिकर्म विकास महामंडळातील टेंडर प्रक्रियेबाबत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले गेले त्या विषयावर मी मा. मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. यात उर्जा विभागाशी काहीही संबंध नाही.
एबीपी माझा चॅनलनी उगाचच कॉंग्रेस मध्ये, माझ्या व नितीन राऊत मध्ये भांडण लावणे हे बरोबर नाही. pic.twitter.com/we8zWpBRF2
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 1, 2021
बातमी दाखवण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याच्या साध्या प्रक्रियेचे पालनही केले नाही. अशा प्रकारच्या निराधार, असत्य बातम्या दाखवण्याचे प्रकार भविष्यात होणार नाहीत याची खबरदारी वृत्तवाहिनीने घ्यावी,” दरम्यान, ज्या कारणामुळे ही बातमी प्रसारित करण्यात आले ते संबंधित पत्र देखील नाना पटोले यांनी जाहीर केले आहे.
हा विषय खनिकर्म विकास महामंडळातील टेंडर प्रक्रियेबाबत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले गेले त्या विषयावर मी मा. मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. यात उर्जा विभागाशी काहीही संबंध नाही.
एबीपी माझा चॅनलनी उगाचच कॉंग्रेस मध्ये, माझ्या व नितीन राऊत मध्ये भांडण लावणे हे बरोबर नाही. pic.twitter.com/we8zWpBRF2
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 1, 2021
एबीपी प्रसारित करण्यात आले बातमी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमाकेदार पत्र लिहिले आहे, हे पत्र एबीपी माझाच्या हाती आले आहे. या पत्रातून सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार करत आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याच्या गैरकारभाराकडे बोट दाखवले आहे. काँग्रेस पक्षाच्याच मंत्र्याच्या खात्यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत, खात्यात घोळ, पदाचा दुरुपयोग तसेच येणाऱ्या काळात एकूणच महाराष्ट्राच्या वीज उत्पादनावर त्याचा होणारा वाईट परिणाम ह्याबाबत त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की नाना पटोले यांचे बोट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आहे.