नागपूर : प्रसिध्द मराठी वृत्तवाहिनीकडून उर्जा विभागासंदर्भात एक बातमी प्रसारित करण्यात आली होती. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतापून, “या वृत्तवाहिनीने ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची दाखवलेली बातमी, ही पूर्णपणे असत्य व चुकीची आहे. आपण ऊर्जा विभागाशी संबंधित पत्र लिहिले नसून, ते पत्र खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे आणि या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही. ऊर्जा विभागाविरोधात पत्र लिहिल्याची खोटी बातमी दाखवून, आमच्याच पक्षाचे मंत्री नितीन राऊत आणि माझ्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या वृत्तवाहिनीने केला असून, हे जबाबदार वृत्तवाहिनीला शोभणारे नाही,” असे ट्विट त्यांनी केले होते.
दरम्यान, यावर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील स्पष्टीकरण दिले असून, नाना पटोलेंनी लिहिलेले पत्र हे माझ्या विभागाला लिहिलेलं नसून, ज्या विभागाला त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे, त्या विभागाची खुशाल चौकशी करावी. तसेच, ज्यांना पत्र लिहिलं आहे, त्यांनी संबंधितांची चौकशी करावी. मी आमदार होण्यापूर्वी माझा स्वतःचा कोळशाचा व्यवसाय होता. नागपूर हे फार काही मोठे शहर नाही. त्यामुळे, आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा एकमेकांसोबत संपर्क असतो. त्यामुळे, हे पत्र नक्कीच माझ्या आणि माझ्या विभागाशी संबंधित नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, हे खाते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अखत्यारित असल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला आहे.
हा विषय खनिकर्म विकास महामंडळातील टेंडर प्रक्रियेबाबत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले गेले त्या विषयावर मी मा. मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. यात उर्जा विभागाशी काहीही संबंध नाही.
एबीपी माझा चॅनलनी उगाचच कॉंग्रेस मध्ये, माझ्या व नितीन राऊत मध्ये भांडण लावणे हे बरोबर नाही. pic.twitter.com/we8zWpBRF2
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 1, 2021
नाना पटोलेंनी लिहिलेल्या पत्रात, “नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा व कोळसा वॅाशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या प्रक्रियेत रखुमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, खनिकर्म महामंडळाने पत्र पाठविले होते. यासंबंधी एक तक्रार दाखल झाली आहे. ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून, या कंपनीचे कुठलेही नेटवर्थ, टर्नओवर आणि सेक्युरिटी क्लीअरंनस नाहीत. तसेच, कोळसा वॅाशिंग करण्याचाही कसला अनुभव नाही. तसेच, ज्या कंपनीसोबत त्यांनी संयुक्त भागीदारी केली आहे, ती ट्रीब्युनलने काळ्या यादीत टाकली आहे,” असे सांगितले आहे.
नितीन राऊत माझ्यात भांडण लावणे बरोबर नाही! चुकीची बातमी दाखवल्यानंतर नाना पटोले संतापले…
तसेच, “रखुमाई कंपनीच्या निविदेच्या कुठल्याही अटी व शर्थींची पूर्तता केलेली दिसत नसून, तरीही या कंपनीला या कामासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. हा गैरप्रकार असून, त्यांना गैरमार्गाने पात्र ठरवण्यात आलं आहे. ही कंपनी कोळश्याचा वेळेवर पुरवठा करण्यासाठी अपात्र असून, त्याचा परिणाम वीज उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे, हे प्रकरण नियमबाह्य व आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करुन, त्याला स्थगिती देण्यात द्यावी,” अश्या आशयाचं पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे.
Read Also :
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
- जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने; ED चौकशीवरून रंगली जुगलबंदी
- देवेंद्र फडणवीस व अमित शहांची भेट म्हणजे २०२४ची रणनीती; रावसाहेब दानवेंनी सांगितले रहस्य