नागपूर : राज्याच्या खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदांवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बोट ठेवले असून, या कामांची चौकशी चौकशी करावी आणि निविदा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अखत्यारित हे खाते येत आहे. त्यामुळे, नाना पटोलेंच्या या ‘लेटरबॉम्ब’मधून शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या खात्यात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप होत असून, सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच हा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नितीन राऊत माझ्यात भांडण लावणे बरोबर नाही! चुकीची बातमी दाखवल्यानंतर नाना पटोले संतापले…
यातच आता, साकोलीचे राष्ट्वादीचे नेते प्रशांत पवार यांनी देखील, या प्रकरणात घोटाळा झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला असून, खनीजकर्म महामंडळांतील कोल वॅाशरीजमध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा, भाजप सरकारच्या काळात झाला असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनीजकर्म महामंडळांच्या टेंडर प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. पण, पटोलेंनी फक्त काम न दिलेल्या कंपन्यांनावर आक्षेप घेतला. मात्र, ज्या हिंद एनर्जी आणि अरिहंत या २ कंपन्यांना काम दिलं गेलं, त्या कंपन्यांनी तब्ब्ल १५ लाख टन कोळसा नेला. या सर्व प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
नाना पटोलेंच्या पत्रावर नितीन राऊतांकडून मोठा खुलासा, म्हणाले…
नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात त्यांनी, “नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा व कोळसा वॅाशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या प्रक्रियेत रखुमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, खनिकर्म महामंडळाने पत्र पाठविले होते. यासंबंधी एक तक्रार दाखल झाली आहे. ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून, या कंपनीचे कुठलेही नेटवर्थ, टर्नओवर आणि सेक्युरिटी क्लीअरंनस नाहीत,” असे सांगितले होते.
शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
तसेच, “या कंपनीला कोळसा वॅाशिंग करण्याचाही कसला अनुभव नाही. ज्या कंपनीसोबत त्यांनी संयुक्त भागीदारी केली आहे, ती ट्रीब्युनलने काळ्या यादीत टाकली आहे. त्यामुळे, खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदेत गैरव्यवहार झाला असून, ठराविक लोकांनाच कामे दिली जात आहेत. रखुमाई कंपनीच्या निविदेच्या कुठल्याही अटी व शर्थींची पूर्तता केलेली दिसत नसून, तरीही या कंपनीला या गैरमार्गाने कामासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे, हे प्रकरण नियमबाह्य व आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करुन, त्याला स्थगिती देण्यात द्यावी,” अश्या आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे.
खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदेची तातडीने होणार चौकशी, उद्योगमंत्र्यांचे आदेश
दरम्यान, यावर आता उद्योगमंत्री मंत्री सुभाष देसाई यांनीही कारवाई केली असून, खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी, नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती त्यांनी स्थापन केली आहे. या समितीद्वाराव आता, १ महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एक सदस्यीय समिती असून, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, महजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे आणि या प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- देशमुख दिल्लीत नाहीत आणि त्यांना ईडीडकडून समन्सही नाही! वकिलांनी केला खुलासा
- आमदार रवी राणांवर होणार कारवाई? उद्घाटन कार्यक्रमाला नियम पायदळी तुडवून केली तोबा गर्दी
- भाजप पाठोपाठ आता महादेव जानकर मैदानात; रविवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार
- “बंडातात्या यांना झालेली अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी”
- लसीकरणावरून गोंधळ, शिवसेनेच्या खासदाराने शिवसैनिकालाच मारले