मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. देशमुख यांना येत्या ५ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाले असून सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांमध्ये सुरु होत्या.
बचावाला येणाऱ्यांनाचं पोलिसांनी बसवून ठेवलयं, मारेकरी अद्याप मोकाट; चित्रा वाघ संतापल्या
मात्र, यावर देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी खुलासा केला असून, “देशमुख दिल्लीला गेलेले नाहीत. आज सकाळीच त्यांची आणि माझी भेट झाली. अजून तरी त्यांच्या नावाने ईडीचे तिसरे समन्स मिळालेले नाही. इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि इतर काही कागदपत्रे, छापा टाकला त्यावेळीच ईडीचे अधिकारी घेऊन गेले. तरीही आणखी कागपत्रांची मागणी ईडीने केल्यास, आम्ही ती त्यांना द्यायला तयार आहोत,” असे सांगितले आहे.
पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेडया!
दरम्यान, ईडीडकडून देशमुखांना या तिसरे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे, तर त्यांचा मुलगा ऋषिकेश यांना दुसरे समन्स येईल. याआधी जेव्हा ईडीकडून त्यांना दोन समन्स बजावले गेले, तेव्हा ईडीला तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी टि्वट केले होते. मात्र, त्यानंतर वयाचे आणि महामारीचे कारण सांगत त्यांनी थेट चौकशी टाळली आणि दूर दृश्य प्रणालीद्वारे चौकशीची मागणी केली होती.
- आमदार रवी राणांवर होणार कारवाई? उद्घाटन कार्यक्रमाला नियम पायदळी तुडवून केली तोबा गर्दी
- भाजप पाठोपाठ आता महादेव जानकर मैदानात; रविवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार
- “बंडातात्या यांना झालेली अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी”
- लसीकरणावरून गोंधळ, शिवसेनेच्या खासदाराने शिवसैनिकालाच मारले
- “मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते, औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी”