कल्याण : कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बचावाला येणाऱ्यांनाचं पोलिसांनी ठाण्यात बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक धजावतील का ?, असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी
कल्याणमध्ये दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केली. यावेळी काही तरुण त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले होते. परंतू, पोलिसांनी आरोपींना अटक करण्याऐवजी मदतीसाठी धावलेल्या तरूणांना ताब्यात घेतले. ते अद्याप पर्यंतही पोलिस ठाण्यात बसून आहेत. आरोपींना अटक करण्याऐवजी मदतीला धावून येणाऱ्यांना ताब्यात का घेतले जात आहे?, त्यांना बसवून ठेवण्यात आले आहे?, असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
कल्याण कोळसेवाडीतील संतापजनक घटना व त्यावर@ThaneCityPolice ची अजब कार्यपद्धती
बचावाला येणार्यांनाचं पोलिसांनी बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक धजावतील का ?
नियम कायदे ढिगाने बनवलेत हो…त्याची अंमलबजावणी कधी होणार @maharashtra_hmo pic.twitter.com/wYnDkAQLPN— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 3, 2021
अशा अनेक घटना घडतांत. तेव्हा आम्ही नागरिकांना सांगतो, तुम्ही बघ्याची भूमिका का घेता?, व्हिडीओ शुटिंग का करत बसता?, मदतीला का धावून जात नाहीत, तेव्हा नागरिकांची उत्तरे येतात की आम्ही मदत करायला गेलो तर पोलिस कर्मचारी आम्हालाच उचलून नेतात. ज्या दोन तरूणांना आणि एका तरूणीला मारहाण झाली, त्यांना मारहाण करणाऱ्यांना अटक का केली नाही?, त्यांना अटक करण्याची अद्याप ठाणे पोलिसांना बुद्धी सुचलेली नाही का?, असे तुम्ही वागाल तर तुमच्या कडे लोक येतील असे तुम्हाला वाटतंय का?, अशा शब्दात प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.
काय आहे नेमके प्रकरण?
एका तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्या रिक्षातून प्रवास करत असताना तो रिक्षाचालक तिची छेड काढू लागला. यानंतर त्या तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने संबंधित ठिकाणी येण्यास सांगितले. यानंतर तिचे दोन्ही मित्र पोहोचल्यानंतर त्यांचा रिक्षाचालकांशी वाद झाला. मात्र यावेळी इतर जमावाला त्या दोघांसह तरुणीला गावातील काही लोकांनी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली.
Read Also :
- गोकुळ मध्ये सत्ता बंटी पाटलांची मात्र सर्व ठेकेदारी महाडिकांची
- बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही