ठाणे : सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये, महामारीचा सामना करण्यासाठी नागरिकांना लसींचे दोन डोस देण्याच्या लसीकरण मोहिमेला वेग आणला जात आहे. राज्यातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे, असं कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर आज, खासदार राजन विचारे यांच्या तर्फे चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालयात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला जवळसपास ३०० लोकांचं लसीकरण इथे केलं जाणार होतं.
मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्याचाच – श्वेता महाले
मात्र, या कार्यक्रमाला परिसरातल्या आसपासच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लसीकरणासाठी कार्यक्रमस्थळी सकाळी ६ वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्या. या कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी संख्या पाहून आणखी २०० जणांचं लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. या कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन, गर्दीचं नियोजन स्थानिक शिवसैनिक आणि पोलीस प्रशासन करत होते. परंतु, गर्दीमुळे गेटवर एकच गोंधळ उडाला.
चंद्रकांतदादा म्हणातात, ‘‘भाजपतल्याही काही नेत्यांचीही चैाकशी व्हायला पाहिजे’’
यावेळी, गेटमधून आत शिरण्यासाठी लोकांनी गोंधळ घातला. त्यामुळे गेट बंद करण्यात आले. तसेच, केवळ ओळखीच्याच लोकांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप यावेळी लोकांनी केला. हा सगळं प्रकार पाहून खासदार राजन विचारे संतापले आणि गेटवर उभ्या असलेल्या शिवसैनिकाला त्यांनी जोरात फटका मारून, “ओळखीच्यांनाच आत का सोडताय? पहाटेपासून लोकांनी रांगा लावल्या आहेत, हा प्रकार बंद करा,” असं दरडावून सांगितलं. त्यामुळे इथे काही काळ थोडासा तणाव निर्माण झाला होता.
दिल्लीला जाताना वय आणि कोरोना आड येत नाही का? देशमुखांच्या दिल्लीवारीवर उठले सवाल
ठाणे शहरात गेल्या ३-४ दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद आहेत. आज ज्याठिकाणी केंद्रं उघडण्यात आली, तिथे लसींचा साठा मर्यादित असल्याने अशाच प्रकारचा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे! सोमवारी महापालिकेने एकाच दिवशी २२ हजार जणांचे लसीकरण करून विक्रम केला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी साठा नसल्याने केंद्रं बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे.
Read Also :
- पोलिस दलातील प्रत्येत शिपाई PSI होणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
- “मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते, औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी”
- पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेडया!
- बचावाला येणाऱ्यांनाचं पोलिसांनी बसवून ठेवलयं, मारेकरी अद्याप मोकाट; चित्रा वाघ संतापल्या
- “अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व”, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने उडवली खिल्ली