मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. देशमुख यांना येत्या ५ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाले असून सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
मोठी बातमी : वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर नजरकैदेत
अनिल देशमुख यांना ईडीने दोनदा समन्स बजावलं होतं. आधी त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचं कारण देऊन ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. नंतर त्यांनी सात दिवसाची मुदत मागवून घेतली होती. येत्या सोमवारी ५ जुलै रोजी त्यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे ईडीने आज त्यांना समन्स बजावलं असून सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सीबीआयचा तपास बेकायदेशीर, कसाबलाही कायद्याचा लाभ घेता आल्याचा युक्तिवाद
दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. देशमुख दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून कायदेशीर बाबींबाबत सल्ला घेणार आहेत. तसेच ते सर्वोच्च न्यायालयातही धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता, चौकशी टाळता कशी येईल, यासाठी देशमुखांकडून या हालचाली केल्या जात आहेत का?, आधी कोरोना आणि वय वाढल्यामुळे चौकशीला हजर राहू शकत नाही, असे कारण दिलेल्या देशमुखांना, दिल्लीला जाताना वय आणि कोरोना आड येत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय खुले चर्चासत्र घ्या, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या?
त्यामुळे आता स्वतःच्या बचावासाठी ईडीसमोर खोटे कारण देणाऱ्या अनिल देशमुखांचा पाय, या प्रकरणात अधिक खोलात जाण्याची शक्यता वाढली आहे. याचसाठी यांच्याकडून पळवाटा शोधल्या जात असल्याच्या चर्चा आता ऐकायला मिळत आहेत.
Read Also :
- बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
- गोकुळ मध्ये सत्ता बंटी पाटलांची मात्र सर्व ठेकेदारी महाडिकांची