मुंबई : राज्याच्या खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदांवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बोट ठेवले असून, या कामांची चौकशी चौकशी करावी आणि निविदा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अखत्यारित हे खाते येत आहे. त्यामुळे, नाना पटोलेंच्या या ‘लेटरबॉम्ब’मधून शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या खात्यात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप होत असून, सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्सूक्षांनीच हा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात नेहमीच्याच चर्चा झाडू लागल्या आहेत.
नाना पटोलेंच्या पत्रावर नितीन राऊतांकडून मोठा खुलासा, म्हणाले…
दरम्यान, यावर आता उद्योगमंत्री मंत्री सुभाष देसाई यांनीही कारवाई केली असून, खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी, नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती त्यांनी स्थापन केली आहे. या समितीद्वाराव आता, १ महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एक सदस्यीय समिती असून, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, महजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे आणि या प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.
जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात त्यांनी, “नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा व कोळसा वॅाशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या प्रक्रियेत रखुमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, खनिकर्म महामंडळाने पत्र पाठविले होते. यासंबंधी एक तक्रार दाखल झाली आहे. ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून, या कंपनीचे कुठलेही नेटवर्थ, टर्नओवर आणि सेक्युरिटी क्लीअरंनस नाहीत,” असे सांगितले आहे.
नितीन राऊत माझ्यात भांडण लावणे बरोबर नाही! चुकीची बातमी दाखवल्यानंतर नाना पटोले संतापले…
तसेच, “या कंपनीला कोळसा वॅाशिंग करण्याचाही कसला अनुभव नाही. ज्या कंपनीसोबत त्यांनी संयुक्त भागीदारी केली आहे, ती ट्रीब्युनलने काळ्या यादीत टाकली आहे. त्यामुळे, खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदेत गैरव्यवहार झाला असून, ठराविक लोकांनाच कामे दिली जात आहेत. रखुमाई कंपनीच्या निविदेच्या कुठल्याही अटी व शर्थींची पूर्तता केलेली दिसत नसून, तरीही या कंपनीला या गैरमार्गाने कामासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे, हे प्रकरण नियमबाह्य व आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करुन, त्याला स्थगिती देण्यात द्यावी,” अश्या आशयाचं पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे.
Read Also :
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
- मोठी बातमी! पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढला, ‘हे’ निर्बंध राहणार कायम