पुणे : केंद्राच्या आणि राज्याच्या ‘टास्क फोर्स’ने देशात आणि राज्यात महामारीची तिसरी लाट येणायची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून, राज्यात महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने पावले उचलायला सुरुवात केली असून, राज्यात सुरु असलेली लसीकरण मोहीमही वसगाने होत आहे. यातच आज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, याही महिन्यात जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील नियमावलीच लागू करायचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार, आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महामारीच्या साप्ताहिक आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीत त्यांनी पुण्यासह पिंपरी, आणि ग्रामीण भागातील महामारीच्या परिस्थितीची आणि लसीकरणाबाबतची माहिती घेतली. यानंतर, झालेल्या बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी,ही माहिती दिली. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आधी ४.६ % इतका होता, तो आता हा ५.३ % एवढा झाला आहे. मे महिन्यात खाली गेलेली बाधित रुग्णांची संख्या, बेफिकिरीने आणि नियमांचे पालन न केल्याने पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे, हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
तसेच, मॉल सुरु करण्याबाबत विचार केला गेला होता, मात्र सेंट्रल एसीमुळे संसर्गाची भीती अधिक असल्याने, मॉल बंदच राहणार आहेत. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड, तिसऱ्या टप्प्यात आणि ग्रामीण भाग चौथ्या टप्प्यात आहे. मात्र, आता ग्रामीण भागातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील. पुण्यातील नागरिकांची लसीकरणाची मोहीम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही, त्यामुळे नियमांत शिथिलता आणली असली, तरी नागरिकांनी गाफील राहू नये आणि नियमांचं पालन करावं,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
पुण्यात काय राहणार सुरू, काय बंद?
- पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
- अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद
- मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने. ४ वाजेनंतर आणि शनिवार-रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा
- खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत
- अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने
- उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनींग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
- अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने
Read Also :
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
- “अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने लक्ष घातलंय ना…आता सगळं काही बाहेर निघेल”