नगर : महाराष्ट्र राज्य सहकार बँक कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी, ईडीने मोठी कारवाई केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आणि त्यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्याशी संबंधित, साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जात असून, यासंबंधी ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली, ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही यावर भाष्य केले आहे. “अजित पवारांचं नाव आत्ता आलं. आम्ही तर कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्यावर सगळं काही बाहेर पडेल”, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
या प्रकरणाची माहिती जेव्हा बाहेर आली, तेव्हा अण्णा हजारे यांनी याचिकाकर्ता म्हणून आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. तसेच, “या प्रकरणात आम्ही कधीपासून त्यांचं नाव घेत आहोत. पण, मी फकीर माणूस. माझं ते कोण ऐकतोय. आता सगळं बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे”, अशा शब्दांत या कारवाईचं त्यांनी समर्थन केलं आहे.
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
“ईडीने जरांडेश्वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात केली आहे. आता त्यांनी ४९ साखर कारखान्यांची चौकशी करावी. आम्ही ४ हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड उच्च न्यायालयात दाखल केलं आहे. ते आता सत्र न्यायालयात आहे. त्यावर केस सुरू आहे आणि योगायोगाने हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं अंत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सहकार चळवळ टिकली पाहिजे, तिचं खासगीकरण होता काम नये,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने; ED चौकशीवरून रंगली जुगलबंदी
दरम्यान, साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली असल्याची माहिती समजत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी यापुर्वीच मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे मुंबई शाखेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे.
Read Also :
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
- “राज्यातील लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार”, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा