मुंबई : पृथ्वीराज चव्हाण दिल्लीहून परत आल्यावर, आज त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि भाजप नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. “भाजपच्या काळात राजकीय वातावरण तापवण्यासाठी तात्पुरती प्रकरणं बाहेर काढली जातात,” असं सांगत त्यांनी, “पाच वर्ष सरकारमध्ये होतात, तेव्हा या वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत, हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं,” असा टोला लगावला आहे.
पोलिस दलातील प्रत्येत शिपाई PSI होणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
“भाजपची लोकप्रियता आता लयाला गेली आहे. यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांची अस्वस्थता सरळ सरळ दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून राजकीय दबावतंत्रासाठी या संस्थांचा उपयोग केला जात आहे. या सगळ्या केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्था आहेत. मात्र, आता या संस्थांची विश्वासर्हता कमी होताना दिसत आहे. जर खरंच राजकीय व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप असतील, तर प्रकरणाचा निकालही लागला पाहिजे. आरोप सिद्ध झाला का नाही, हे शेवटी सांगा. पण टांगती तलवार ठेवणे योग्य नाही,” असं म्हणत त्यांनी या संस्थांच्या विश्वासार्हतेवर शंका व्यक्त केली आहे.
“मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते, औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी”
तसेच, पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना, “नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा महामारी नसतानाही त्यांनी कितीवेळा अधिवेशनं घेतली, याची माहिती भाजपने दयावी आणि त्यानंतरच बोलावं. त्यामुळे, येणाऱ्या अधिवेशनात राज्य सरकारकडून विरोधकांना सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील,” असं सांगत त्यांनी, “विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळणार, मात्र कोण, त्याचे नाव दिल्लीकडूनच कळेल. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र, ही निवडणूक या अधिवेशनात होणार की आणखी कधी हे सांगणं अवघड आहे,” असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
लसीकरणावरून गोंधळ, शिवसेनेच्या खासदाराने शिवसैनिकालाच मारले
यावेळी, “भाजपला निवडणुका जिंकून नाही, तर तोडफोड करून सत्ता मिळवता येते, हे आता जगजाहीर झालं आहे. या महामारीच्या काळात मोदी सरकारने, देशातील नागरिकांचे अत्यंत हाल केले. हे सर्व पुसण्यासाठी राज्यांतील सरकार पाडण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आघाडी सरकार भक्कम आहे आणि आगामी निवडणुकीत आघाडीला चांगलं यश मिळेल आणि भाजप राज्यातून संपेल,” असा दावाही त्यांनी केला आहे.
Read Also :
- खनीजकर्म महामंडळांच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा? राष्ट्रवादीच्या नेत्याची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी
- देशमुख दिल्लीत नाहीत आणि त्यांना ईडीडकडून समन्सही नाही! वकिलांनी केला खुलासा
- आमदार रवी राणांवर होणार कारवाई? उद्घाटन कार्यक्रमाला नियम पायदळी तुडवून केली तोबा गर्दी
- भाजप पाठोपाठ आता महादेव जानकर मैदानात; रविवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार
- “बंडातात्या यांना झालेली अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी”