मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांची भेट झाली. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप व शिवसेना राज्यात पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेला दांडी, रिकामी खुर्ची असलेल्या फोटो व्हायरल
हे पण वाचा: टीकेचं विष प्राशन करुन ओबीसींना आरक्षण मिळत असेल, तर आमची तयारी आहे; पंकजा मुंडे म्हणतात…
राऊत व शेलार यांच्या भेटीविषयी माहिती नसल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, कोणाच्या भेटीगाठी झाल्या याबाबत मला माहिती नाही. अधिकृतपणे कोणाचीही भेटगाठ नाही किंवा चर्चा नाही. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी लढाई लढण्याची आमची तयारी आहे.
हे पण वाचा: आम्ही जे पाच महिन्यात करुन दाखवल , ते या सरकारला अठरा महिन्यात का जमले नाही; फडणवीस यांची सवाल
फडणवीस म्हणाले की, यापूर्वी आमचे शिवसेनेशी शत्रुत्व आणि वैचारिक मतभेद नव्हते. मात्र त्यांनी वैचारिक मतभेद असणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले आहे. राजकारणात जर-तरच्या प्रश्नाला अर्थ नसून त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात, असे म्हणत त्यांनी सेना-भाजप भविष्यात एकत्र येण्याच्या प्रश्नावर सावध भाष्य करणे पसंत केले. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा सल्ला मी फडणवीसांना दिला होता, असं विधान आठवलेंनी केलं होतं. त्यावर आठवलेंनी योग्य वेळी योग्य सल्ला ऐकला असता तर ते मुख्यमंत्री झाले असते, असा टोला फडणवीसांनी लगावला.
हे पण वाचा: प्रथेला फाटा देत अधिवेशन पूर्वेसंध्येला मुख्यमंत्र्याने पत्रकार परिषद टाळली, राज्यात चर्चेला उधाण
यावेळी त्यांनी आघाडी सरकारने अधिवेशन दोन दिवस घेण्याच्या निर्णयावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू या भीतीने सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे. अधिवेशन दोन दिवसांचं आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी समन्वय नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं चित्रं दिसत नाही. राज्य सरकारचे सात अधिवेशने झाली आहेत. त्यांच्या अधिवेशनाचा कालवधी ३८ दिवसांचा राहिला आहे. अधिवेशन हे आठवं अधिवेशन आहे. त्यामुळे या आठ अधिवेशनांचा कालावधी सरासरी पाच दिवसांचा राहिला आहे. कोविडच्या काळात महाराष्ट्रानं १४ दिवसांचं अधिवेशन घेतलं. तर संसदेनं ६९ दिवसांचं अधिवेशन घेतलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.