मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सत्ताधारी आणि विरोधक पहिल्याच दिवशी आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. त्यामुळे भाजपच्या तब्बल १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले. यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी “हिसाब बराबर होगा”, म्हणतं महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यासाठी ठाकरे सरकारचा पुर्वनियोजित कट
चित्रा वाघ यांनी व्टिटरच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, “संविधान बचावचे नारे देणारेचं संविधानाचा, लोकशाहीचा गळा घोटत आहेत. १२ आमदरांचे निलंबन करून सरकारने मुस्कटदाबी चालवली आहे. राज्याच्या जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल. कारण ते जनतेचा आवाज सभागृहात उठवतं होते. लक्षात ठेवा….हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा…”, असे म्हणत चित्रा वाघ यांनी सरकाराला इशारा दिला आहे.
संविधान बचावचे नारे देणारेचं संविधानाचा….
लोकशाहीचा गळा घोटत आहेत…
१२ जणांचं निलंबन करून मुस्कटदाबी चालवलीये…राज्याच्या जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल कारण ते जनतेचा आवाज सभागृहात उठवतं होते
लक्षात ठेवा….हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा….@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 5, 2021
सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
Read Also :
- “आजची शिवीगाळ, धक्काबुक्की ही फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली झाली”- नवाब मलिक
- १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपची तातडीची बैठक; राज्यपाल कोश्यारींची घेणार भेट
- भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यासाठी ठाकरे सरकारचा पुर्वनियोजित कट
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा, ठाकरे सरकारकडून विधानसभेत ठराव मंजूर
- विधानसभेचं वातावरण तापलं, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ