मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ईडीने नोटीस बजावल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वर्षा राऊत यांना कथित पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावल्याच्या सांगितले जाते. त्यांना 5 जानेवारी रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
वर्षा राऊत यांनी ईडीची नोटीस आल्यानंतर पीएमसी बँक घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. याआधी या प्रकरणच्या चौकशीसाठी शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले होते. मात्र आता या कथित घोटाळ्याशी वर्षा राऊत यांचे नाव जोडले गेल्याने भाजपकडून वायकर यांची खिल्ली उडवली जात आहे.
भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रवींद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला… pic.twitter.com/nR3szBBWqE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 2, 2021
भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रवींद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी वायकर यांची खिल्ली उडवली.
दरम्यान, वायकर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. पैसे अडकलेल्या लोकांसाठी वेगाने कारवाई करावी, अशी आशयाची पत्रे त्यांनी केंद्राला लिहिले होती.