पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितींना संबोधित केले. यावेळी बोलताना राममंदिर हे आधुनिक भारताच्या संस्कृतीचे प्रतिक असून, ते राष्ट्र जोडणारे ठरेल असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, अयोध्येतील हे भव्य राम मंदिर भारतीय संस्कृतीचे आधुनिक प्रतिक असेल. मंदिर उभारणीची प्रक्रिया संपूर्ण देशाला जोडणारी ठरेल. मंदिर पूर्ण झाल्यावर केवळ अयोध्येचीच भव्यता वाढेल असे नव्हे, तर या भागाचे अर्थतंत्र बदलेल. पल्याला सर्वांसोबत सर्वांचा विश्वास जिंकून विकास करायचा आहे. भगवान रामांचाही हाच संदेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, कोरोनाच्या या काळात प्रभू रामचंद्रांचा मर्यादेचा मार्ग आज अधिक गरजेचा आहे. तो आहे- ‘दो गज की दूरी, मास्क है जरूरी’ देश जेवढा शक्तिशाली होईल, तेवढी शांतता कायम राहील. हीच रामाची नीती आहे. गांधींच्या रामराज्याचे हेच सूत्र होते.