अयोध्येतील ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
दरम्यान, गायक आनंद शिंदे यांनी अयोध्येत बौद्धविहार बांधण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले बोलत होते. ‘आनंद शिंदेंच्या आधीपासूनच आपण यासाठी प्रयत्नशील आहोत.अयोध्येतील ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधण्याकरिता आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांची भेट घेणार’, असे रामदास आठवलेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
‘आनंद शिंदेंनी यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. सध्याची परिस्थिती पाहता सर्व नेते एकत्र येणार नाहीत. मी देखील त्यांच्यासोबत जाणार नाही. मात्र, बौद्ध विहार बांधण्यासाठी माझे प्रयत्न सुरु ठेवणार आहे’, असे रामदास आठवलेंनी स्पष्ट केले आहे. ‘आनंद शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत. आनंद शिंदेनी अयोध्येत बौद्धविहार उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, मी गेली ७ ते ८ वर्षे ही मागणी करत आहे.आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांची भेट घेणार’, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.
‘आनंद शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत. आनंद शिंदेनी अयोध्येत बौद्धविहार उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, मी गेली ७ ते ८ वर्षे ही मागणी करत आहे. अयोध्येत आता राम मंदिर उभारण्यात येणार आहे. त्या भूमीत राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. मात्र, त्याआधी तिथे बौद्धविहार होते. त्यामुळे अयोध्येत बौद्धविहार उभारलं जावं यासाठी फार पूर्वीपासून मी प्रयत्नशील आहे. अयोध्येतील या बुद्धविहारासाठी सरकारने जागा दिल्ली तर ठीक नाहीतर एका ट्रस्टची स्थापन करुन आम्ही अयोध्येत ३० एकर जागा खरेदी करू’, असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे.