अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजकारण निवडणुका संपल्यानंतर ही धगधगत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हा बँक निवडणुकीतील सहकार पॅनलचे सदस्य वीरेंद्र जगताप यांच्या घरावर आज सकाळच्या सुमारास काही तरुणांनी गोटमार केली व घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जरडेंश्वर कारखान्यांवर आयटीचा छापा; अजित पवारांच्या निकटवर्तींयांवर कारवाई?
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. या निवडणुकीत सहकार पॅनल यश संपादन केले आहे. याच यशाचा जल्लोष करत असताना काही कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने कालपासूनच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यात येत होतं. अशाप्रकारे हल्ला होऊ शकतो अशी शक्यता सुद्धा माजी आमदार जगताप यांनी वर्तविली होती.
अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
याच घटनेच्या अनुषंगाने आज सकाळच्या सुमारास चांदूर रेल्वे मतदार संघातील माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर काही तरुणांनी दगडफेक करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या हल्ल्याबद्दल बोलताना माजी आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले की, सदर हल्ला हा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
कोरोनाचे संकट कायमसाठी जाऊ दे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबादेवीचरणी प्रार्थना
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हा हल्ला जाणीवपुर्वक घडून आणला आहे अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो अशी सूचना आम्ही पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी ज्या तरुणांना पकडले दोनही प्रहारचे कार्यकर्ते असून त्यांना बच्चू कडू यांचे सातत्याने फोन सुरू आहे, वाटल्यास डीसीआर तपासून पोलिसांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी माजी आमदार जगताप यांनी केली आहे.
Read Also :
- माझ्यावरील कारवाई समजू शकतो, पण बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? – अजित पवार
- जिल्हा परिषदेतच जाऊ द्या, पुढच्या निवढणुकीत घवघवीत यश मिळवू – अजितदादांचा विश्वास
- नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो – नरेंद्र मोदी
- जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही भाजपाचा पहिला क्रमांक कायम, कार्यकर्त्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील
- नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का: काँग्रेसला घवघवीत यश, राष्ट्रवादीला मात्र दोनच जागांवर मानावे लागले समाधान