मुंबई : सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे, असं म्हणत शिवसेनेने सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; मिनी मंत्रालयावर कुणाचा झेंडा फडकणार?
नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?, असा संतप्त सवाल शिवेसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात अघोषित आणीबाणी, हे रामराज्य आहे का? – संजय राऊतांचा रोखठोक सवाल
प्रियंका गांधी यांना योगी सरकारने अखेर अटक केली आहे. मागील 36 तासांपासून त्यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ज्या घाणेरडय़ा जागेत प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते त्या जागेत प्रियंकांना स्वतः साफसफाई करावी लागत होती. हातात झाडू घेऊन कचरा काढणाऱ्या प्रियंकांचा एक व्हिडीओ जगभरात व्हायरल झाल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर राजकीय हल्ले होऊ शकतात, पण देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून हिंदुस्थानच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या ‘नात’ आहेत, यांचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते.
माझं बोलणं रेकॉर्ड करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही – नितीन गडकरी
कैदखान्यातून प्रियंका गांधींनी मोदी सरकारला जळजळीत प्रश्न विचारला आहे, ‘‘माझा अपराध काय? कोणत्याही वॉरंटशिवाय, एफआयआरशिवाय मला डांबून का ठेवले? शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे काय?’’
Read Also :
- जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाचा झेंडा फडकणार?
- पिंपरी- चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा राज्य सरकारला घरचा आहेर!
- अजितदादा, पालकमंत्री बच्चू कडू यांना समज द्या, अन्यथा…- अमोल मिटकरी
- शिवसेना खासदार संजय राऊत राहूल गांधीच्या भेटीला; नेमकी काय भूमिका घेणार?
- किरीट सोमय्यांना १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या कठोर अटी