मुंबई : लखीमपूर खिरी येथील घटनेबद्दल जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी नेते आणि विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार यांच्याविरोधात जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. लखीमपूर येथे भेट द्यायला गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आल्याबाबत काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. हेच का तुमचे रामराज्य, असा रोखठोक सवाल यावेळी करण्यात आला आहे.
रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद – फडणवीस
प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, काँग्रेसशी असू शकते, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतले? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला; लवकरच होणार भाजप प्रवेश
लखीमपूर खेरी येथील झालेल्या हिंसाचारावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
राज्यातील विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले तेव्हा त्यांना कोणी रोखले नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. शेतकऱ्यांना मारायचे व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही? केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता, असे म्हणत शिवसेनेने उत्तर प्रदेशातील घटनेवर संताप व्यक्त केला.
विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेसाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
दरम्यान, आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं!, असे शिवसेनेनं म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर संताप व्यक्त केला.
Read Also :
- जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; मिनी मंत्रालयावर कुणाचा झेंडा फडकणार?
- देगलूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयाने, राज्यातील परिवर्तनाची गती वाढेल – चंद्रकांत पाटील
- कोरोनाची तिसरी लाट येईल असं वाटत नाही, तशी चिन्ही दिसत नाहीत – मुंबई महापालिका
- रामदास कदमांवर शिवसेना कारवाई करणार? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
- …तोपर्यंत ठाकरे सरकारला जगू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा