वाशिम : जिल्हा परिषद व पंचायत समितीत आरक्षणाच्या मुद्यावर लागलेली पोटनिवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. मंगळवारी (ता.५) जिल्हा परिषदेच्या १४ तर, पंचायत समितीच्या २७ जागांची पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यात या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी अटातटीचा सामना होत आहे.
विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेसाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा ५० टक्केच्यावर गेल्याने जिल्हा परिषदेतील १४ तर, पंचायत समितीच्या २७ जागा रिक्त केल्या होत्या. त्यानंतर तिन वेळच्या स्थगितीनंतर आता ही पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेतील १४ जागा कोण घेणार? यावरच जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन अवलंबून असेल. रिसोड तालुक्यात कवठा गटात अपक्ष स्वप्निल सरनाईक, काँग्रेसकडून वैभव सरनाईक तर, शिवसेनेच्या मंगला सरनाईक असा, तिरंगी सामना होत आहे. गोभणी गटातून काँग्रेसच्या रेखा उगले, शिवसेनेच्या बेबी ठाकरे, जिल्हा विकास आघाडीच्या पुजा भूतेकर रिंगणात आहेत. भर जहागीर गटात वंचितचे अनिल गरकळ, भाजपचे विनोद नरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित खडसे, अपक्ष योगेश वाळके, पांगरी नवघरे गटातून सहा उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज – चंद्रकांत पाटील
कारंजा तालुक्यातील भामदेवी गटातून सहा उमेदवार, मानोरा तालुक्यातील कुपटा गटातून चार उमेदवार, तळप गटात चुरशीचा सामना होत असून, चार उमेदवाराचे भाग्य आज ठरणार आहे. फुलउमरी गटातही तीन उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. वाशीम तालुक्यातील काटा गटात शिवसेनेच्या लता खानझोडे, राकाँच्या प्रियंका देशमुख, काँग्रेसच्या संध्या देशमुख, भाजपच्या रुंदा भिसे, वंचितच्या शालिनी राऊत, पार्डी टकमोर गटातून काँग्रेसचे विठ्ठल चौधरी, भाजपचे सुनिल चौधरी, राकाँचे विनोद पट्टेबहादूर, वंचितचे प्रल्हाद वाणी, अपक्ष सरस्वती चौधरी व रामेश्वर कालापाड, उकळीपेन गटात सर्वाधिक चुरस निर्माण झाली आहे या गटातून तब्बल बारा उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार ? हे बुधवारी (ता.६) ला दुपारपर्यंत समजणार!
देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला; लवकरच होणार भाजप प्रवेश
पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेतील १४ व पंचायत समितीच्या २७ जागा कोणाकडे जाणार? यावरच जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन अवलंबून राहणार आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीला गमावलेल्या जागा कमवाव्या लागणार आहेत, अन्यथा जिल्हा परिषदेचे राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.
Read Also :
- देगलूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयाने, राज्यातील परिवर्तनाची गती वाढेल – चंद्रकांत पाटील
- कोरोनाची तिसरी लाट येईल असं वाटत नाही, तशी चिन्ही दिसत नाहीत – मुंबई महापालिका
- रामदास कदमांवर शिवसेना कारवाई करणार? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
- …तोपर्यंत ठाकरे सरकारला जगू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
- धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशा लढाईत भाजपचा विजय निश्चित – सुभाष साबणे