मुंबई : मुंबईमध्ये लसीकरण मोहीम व्यवस्थितपणे सुरु असल्यानं तिसरी लाट येण्याची चिन्हं दिसत नाहीत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टात दिली आहे. शहरात ४२ लाखांहून अधिक लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर ८२ लाखांहून अधिक लोकांनी एक डोस घेतला आहे, असंही पालिकेनं हायकोर्टात सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला; लवकरच होणार भाजप प्रवेश
पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी हायकोर्टाला सांगितलं की, “अंथरुणाला खिळलेल्या २,५८६ लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर अशाच ३,९४२ लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. अद्यापही लसीकरण मोहिम व्यवस्थित सुरु आहे. सध्या लसीचा कुठलाही तुटवडा भासत नाही. मुंबई कोरोनापासून सुरक्षित आहे. आम्हाला कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हं दिसत नाही”
अभ्यास नको, गप्पा मारा; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची वर्गात जाऊन भन्नाट सुरूवात
या वर्षाच्या सुरुवातीला अॅड. धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी जनहित याचिका दाखल करत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने ७५ वर्षांवरील नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच अंथरुणाला खिळलेल्या अपंग व्यक्तींसाठी घरोघरी जाऊन लस द्यावी, अशी मागणी केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठानं सुनावणी घेतली यावेळी पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी हायकोर्टाला याबाबत माहिती दिली.
ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार? – फडणवीस
सुरुवातीला केंद्र सरकारने घरोघरी जाऊन लस देणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. पण गेल्या महिन्यात याला मान्यता दिली. सप्टेंबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, घरोघरी लसीकरणाबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पण तत्पूर्वीच महाराष्ट्र सरकारनं पायलट प्रोजेक्ट म्हणून अंथरुणाला खिळलेल्या लोकांना लसीकरण मोहिम सुरु केली होती.
Read Also :
- रामदास कदमांवर शिवसेना कारवाई करणार? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
- …तोपर्यंत ठाकरे सरकारला जगू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
- धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशा लढाईत भाजपचा विजय निश्चित – सुभाष साबणे
- प्रियंका गांधींना भाजप घाबरते, पोलिसांनी त्यांना तात्काळ सोडाव, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर…?
- कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी पेटवली; प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात