मुंबई : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना लखीमपूर येथे जाण्यापासून उत्तर प्रदेशातील पोलिसांनी रोखलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात तालिबानी राज सुरू आहे. पीडित कुटुंबांना भेटणं भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का?; असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही नाना पटोले यांनी निषेध केला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; काही दिवस आराम करणार असल्याची ट्विटरवर माहिती
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संतप्त सवाल केला. मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट यांचे सरकार आटापिटा करत आहे. तर पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन के तसेच त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत, पीडित कुटुंबियांना भेटू दिले जात नाही, असा आरोप पटोले यांनी केला.
कुठेही गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोकं म्हणतात गडकरी साहेबांची कृपा; पवारांकडून कौतूकाची थाप
प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जात असताना रस्त्यावर अनेक ठिकाणी अडवण्यात आले. प्रियंका गांधी यांना भारतीय जनता पक्ष व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का घाबरतात? पीडित कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का? उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अत्याचारी राजवटीला तेथील जनता कंटाळली आहे. या अत्याचारी सरकारला जनता धडा शिकवेल. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रियंकाजी गांधी यांना पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं ते म्हणाले.
ठाकरे सरकारच्या ३ सदस्यीय प्रभागरचनेला ग्रहण; मनसे न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आज आंदोलन करणार आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 4 वाजता मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
Read Also :
- कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी पेटवली; प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- शाळेचं नाही तर आपल्या भविष्याचं दार उघडलं; उद्धव ठाकरेंचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद
- गुगलवर टरबुज सर्च करा, मग कळेलं गद्दार कोण? एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली
- मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर शिवसेना खासदार भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार?
- मला काही बोलायचे नाही, मी काम करणारा माणूस – अजित पवार