हिंगोली : सरकारने कुठलीही चालढकल न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व पीककर्ज ताबडतोब स्थगित करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.२ ऑगस्ट) केली. ते हिंगोली तालुक्यातील कनेरगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता विदर्भ व मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
फडणवीस म्हणाले, ज्यावेळी आम्ही सत्तेत होतो तेव्हा, दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला सातशे ते आठशे कोटी रुपयांची मदत मिळत होती. तरी देखील हे लोक मोर्चे काढत होते. मात्र,आता हे स्वतः सत्तेत असताना शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. हे सरकार शेतकरी विरोधी असून मराठवाडा व विदर्भाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्या सरकारने मराठवाडा व विदर्भासाठी पंचवीस हजार कोटी रूपये वैधानिक विकास महामंडळाला दिले होते. मात्र, या सरकारने ही मंडळे बंद केली आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ आली की, हे सरकार सरसकट केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करते, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची मानसिकताच नसल्याचा आरोपही फडणवीस त्यांनी सरकारवर केला.
सत्तेचा अमर पट्टा घेऊन जन्माला आलेलं हे सरकार नाही; काही दिवसात आमचं सरकार निश्चित येणार – फडणवीस
एनडीआरएफ मधील पैसा सरकारने खर्च केल्यानंतर पुन्हा केंद्राकडे मदत मागता येऊ शकते. यामुळे सरकारने चालढकल न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व पीक कर्जाला तात्काळ स्थगिती द्यावी.आम्ही सरकारमध्ये असताना हेच लोक हेक्टरी पन्नास हजार रूपये देण्याची मागणी करत होते. आता त्यांची सत्ता आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करण्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पाचशे रूपये मागत आहेत. यावर फडणवीस यांनी संताप व्यक्त करत म्हणाले की, अशा विमा कंपन्यांना सरकारने सरळ करून सरसकट विमा मिळवून द्यायला पाहीजे.
शिवसेना खासदार भावना गवळींना वर्षावर नो एन्ट्री; अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष अधिवेशनाची मागणी आपण करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावेळी फडणवीस म्हणाले, हे सरकार नियमित अधिवेशन चालवण्यासाठी टाळाटाळ करते, ते काय विशेष अधिवेशन बोलावणार.. शेतकऱ्यांबद्दल हे सरकार उदासीन असल्याचे फडणवीस म्हणाले.
Read Also :
- …म्हणून भाजप आमदाराने मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं; चंद्रकात पाटलांनी दिलं स्पष्टीकरण
- पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार रिंगणात; भाजपची नव्या रणनीतीकडे कुच?
- अनिल परब प्रकरणात रामदास कदमांनी किरीट सोमय्याला रसद पुरवली; व्हायरल ऑडिओ क्लीपने खळबळ
- ठाकरे सरकारच्या ३ सदस्यीय प्रभागरचनेला ग्रहण; मनसे न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार
- राज्यात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता; भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ