मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र, या तिन्ही पक्षांतील नेत्यांत कुरबुरी असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत आणि यावरुन महाविकास आघाडी सराकरमध्ये सर्वकाही आलबेलं नसल्याचं बोललं जात आहे. यावरुन भाजपने पुन्हा एकदा निशाणा साधल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीत पडली फूट; मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढत रंगणार
राज्यात 3 पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे. 2 पक्षाचे संकेत जे आमच्याकडे येत आहेत. त्यावरून राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागू शकते, असं सूचक विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. मावळ भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेना खासदार भावना गवळींना वर्षावर नो एन्ट्री; अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही
राज्यात असलेला सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगेबाज असलेलं सरकार आहे. राष्ट्रवादी हा घोटाळेबाज, काँग्रेस हा झोलबाज आणि शिवसेना हा दगाबाज अस हे तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून निवणुकीत यश मिळवलं. पण निवडणूक झाल्यानंतर दगाबाजी केली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष दगेबाजच असणार आहे, अशी टीका माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
Read Also :
- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर
- निलेश लंकेंच्या पत्राच्या घरात शरद पवारांची बैठक; लाकडी कपाटाला प्लॅस्टिकची खुर्ची टेकवून बसले
- सरकार ज्या- ज्या ठिकाणी जागा देईल तिथे आम्ही आमच्या पैशातून विकास करणार – नितीन गडकरी
- कुठेही गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोकं म्हणतात गडकरी साहेबांची कृपा; पवारांकडून कौतूकाची थाप
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; काही दिवस आराम करणार असल्याची ट्विटरवर माहिती