अदमदनगर : केंद्रीय रस्त्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती आणि दूध उत्पादनावर भर दिला. दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी गडकरी यांनी भारत सरकार करत असलेल्या एका संशोधनाची माहितीही दिली. त्यात गाईचं गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्याबाबत नाविन्यपूर्ण माहिती गडकरी यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी जागा देईल त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या पैशांनी विकास करायला तयार आहोत, असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.
सेल्फी विथ खड्डे… घेणाऱ्या सुप्रियाताई आता कुठे आहेत? मुंबईतील खड्यावरून विरोधक आक्रमक
गडकरी म्हणाले, येणाऱ्या काळात साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारा विकास किती मोठा आहे हे आपण जाणतो. दुधाच्या माध्यमातून विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी केला आहे. मदर डेअरी 3 लाख लिटर दुध कलेक्ट करते 10 लाखावर गेलं पाहिजे. एकट्या पुणे जिल्ह्यात जे दूध संकलित होतं तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची लाज वाटली पाहिजे. गाईना सीमेन्स शंभर रुपयांपेक्षा कमी रुपयात उपलब्ध करून दिल आहे. गाईचं पोट ट्रान्सप्लांट करायचं आणि चांगल्या गाईचं ट्रान्सप्लांट केलं तर दूध वाढू शकतो, असेही ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान, पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा – फडणवीस
मी नेहमी स्पष्ट बोलतो. मला साखर कारखानदारी समजल्यामुळे, मी मागच्या जन्मी पाप केल्यामुळे मी साखर कारखानदारीतून बाहेर पडलो आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार मी तीन साखर कारखाने चालवत होतो. साखर कारखानदारीतून आपण बाहेर पडू शकतो. हे कसं शक्य होणार. आपण हे समजून घेतलं पाहिजे की शेतकरी जिवंत राहिले तर कारखाने जिवंत राहतील. कारखान्याची नरडी पकडून बंद करायचं ठरवलं अन् तुमचा ऊसच घेणारे टिकले नाही तर ऊस कुठं पिकवणार तुम्ही. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचं शोषण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
प्रोटोकॉलप्रमाणे चिपी विमानतळाच उद्घाटन होणार; नारायण राणेंच नाव कितव्या क्रमांकावर?
अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो एक शेती पीक नष्ट झालं आहे. शेतकऱ्यांना वाटतं की आज खऱ्या अर्थानं आधार देणारं पीक हे ऊस आहे. सध्या एकच पीक घेण्याची प्रवृत्ती शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे, ते पीक म्हणजे ऊस. अशावेळी ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत गडकरी लक्ष घालतील अशी अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगितलं.
Read Also :
- कुठेही गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोकं म्हणतात गडकरी साहेबांची कृपा; पवारांकडून कौतूकाची थाप
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; काही दिवस आराम करणार असल्याची ट्विटरवर माहिती
- पवारसाहेबांना पंतप्रधान अन् अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचयं – खासदार अमोल कोल्हे
- पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
- सत्तेचा अमर पट्टा घेऊन जन्माला आलेलं हे सरकार नाही; काही दिवसात आमचं सरकार निश्चित येणार – फडणवीस