मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. मात्र, या निवडणुका पुढे ढकलण्यास आता निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्देशानुसारच या निवडणुका होत असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती.
भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी; प्रवीण दरेकरांना इशाऱ्याला दादाचं रोखठोक उत्तर
कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. येत्या 5 ऑक्टोबरला मतदान आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांसाठी मतदान?
धुळे – 15, नंदूरबार – 11, अकोला – 14, वाशिम -14, नागपूर -16, पालघर पोटनिवडणूक –
नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
धुळे -30, नंदूरबार -14, अकोला -28, वाशिम -27, नागपूर -31
असा आहे निवडणूक कार्यक्रम
15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार आहेत. 21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार आहे. 29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 6 ऑक्टोबरला निकाल जाहीर असून जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागा तर पंचायत समितीच्या 144 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Read Also :
- खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, रस्त्याची कामे नीट करा – एकनाथ शिंदे
- मोठी बातमी: ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
- स्वत:च्या घरात काय चाललंय ते बघा, दुसऱ्यांबद्दल का बोलता? – अमृता फडणवीस
- परत कोणी महिलेला स्पर्श केला…; बलात्कार प्रकरणावरून पंकजा मुंडे संतापल्या
- ‘हिंदू खतरे में है’ ही निव्वळ कल्पना, भाजपावर ३०२ चा गुन्हा दाखल करा – काँग्रेस