कोल्हापूर : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी 80 हजार बनावट खाती उघडण्यात आल्याचे समोर आले होते. आता यामागे भाजप असल्याचा धक्कादायक आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
सोशल मीडियावर 80 हजार बनावट खाती उघडून त्या माध्यमातून अनेक गैरप्रकार केल्याचे अमेरिकेतील विद्यापीठाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. यामागे भाजपाचा हात असल्याचेही स्पष्ट झाले असल्याचे, हसन मुश्रीफ म्हणाले.
देश – विदेशामध्ये असंख्य बनावट खाती सुरू करून त्या माध्यमातून घोटाळे करण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ही बनावट खाती भाजपाकडून चालवली जात होती अशी माहिती पुढे आली आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.