अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले आहे. यातच आता भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची सीबीआय चौकशी व्हावी आणि दोन्ही नेत्यांची नार्कोटेस्टही करण्याची मागणी केली आहे.
भाजपा नेते निखिल आनंद म्हणाले की, ‘सीबीआयच्या तपासामुळे शिवसेना खूप चिंताग्रस्त आणि भयभीत आहे. जर शिवसेनेच्या लोकांना सर्व काही माहित असेल तर सीबीआयने संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून हे रहस्य समोर येईल. आदित्य ठाकरे यांनी भीतीपोटी स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांनीच का राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मौन सोडावं”
दरम्यान . “सुशांत प्रकरणात काँग्रेसने मौन सोडलं पाहिजे, महाराष्ट्र सरकार घाणेरडे राजकारण करत आहे. फक्त आदित्यचं नव्हे तर या प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या प्रकरणात मौन सोडलं पाहिजे. वस्तुस्थितीशी छेडछाड केली जात आहे, पुरावे मिटवले जात आहेत. सीबीआयने या सर्व बाबी विचारात घेतल्या पाहिजेत असेहि ते म्हणाले.
यापूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून संजय राऊत यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी, सुशांतचे वडील केके सिंह, भाजप आणि बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. याच पार्श्वभूमिवर निखिल आनंद यांनी शिवसेनेवर पलटवार केल्याचे बोलले जात आहे.